
हिंदू धर्मात गंगाजल आणि तूळस ही अत्यंत पवित्र मानली जाते. या दोन्ही व्रत वैकल्य आणि पूजा विधीत मान आहे. गंगाजल शिंपडल्याने परिसर पवित्र होतो अशी मान्यता आहे. इतकंच काय तर गंगेत स्नान केल्याने पापमुक्ती होते अशी धारणा आहे. कारण गंगेला स्वर्गाची नदी म्हटले जाते.

पुराणांमध्ये गंगा नदीचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. मृत्यूच्या वेळी तोंडात गंगाजल ठेवल्याने शरीर सोडताना आत्म्याला जास्त वेदना होत नाहीत. इतकंच काय तर मृत्यू देवताही त्रास देत नाही.

गंगाजल तोंडात असेल तर आत्म्याचा पुढील प्रवास सोपा होतो, अशी मान्यता आहे. इतकंच काय तर गंगाजल जीवाणूंच्या वाढीस देखील प्रतिबंधित करते. गंगाजलासोबत तुळशीच्या पानांना देखील तितकंच महत्त्व आहे.

धार्मिक दृष्टिकोनातून तुळशीला खूप महत्त्व आहे. असे म्हटले जाते की तुळशीचा संबंध नेहमीच विष्णूशी असतो.मृत्युच्या वेळी तुळशीची पाने तोंडात ठेवल्याने आत्मा पवित्र होतो अशी मान्यता आहे. तसेच मृत व्यक्तीला मोक्ष मिळतो अशी धारणा आहे.

धार्मिकतेसह तुळशीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही पाहीलं जातं. तुळशीला एक हर्बल अँटीबायोटिक मानले जाते. . तुळशी हे अनेक आजारांवर प्रभावी औषध आहे. तुळशीचं पान तोंडात ठेवल्याने सात्विक भावना जागृत होते अशी मान्यता आहे.

मृत्यूवेळी तुळशी आणि गंगाजल पाजलं तर सदर व्यक्तीला मृत्यू देव यम थेट स्वर्गात घेऊन जातात.मृत व्यक्तीच्या कपाळावर तुळशीचे पान ठेवल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. गंगाजल पिताना मृत्युमुखी पडणारे कधीही नरकात जात नाहीत. (सर्व फोटो- टीव्ही नेटवर्क फाईल)