ऐन महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा, अखेर रेल्वे प्रवास स्वस्त होणार? महत्त्वाची अपडेट समोर
भारतातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण रेल्वेने कोट्यवधीं रुपयांचं कर्ज फेडलं आहे. त्यामुळे रेल्वे तिकीट दर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

देशभरातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्वत: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत संकेत दिले आहेत. रेल्वेने नुकतेच 1.93 लाख कोटी रुपये कर्ज फेडलं आहे. मागील 5 वर्षांत एकूण हे कर्ज फेडलं आहे. कर्जाचे व्याज देखील फेडलं आहे. नव्याने दुसरं कर्ज देखील घेतलेले नाही. आता कर्ज फेडल्यानंतर नव्याने कर्ज मिळू शकते. तसेच कर्ज फेडल्याने रेल्वेला कमाईचा फायदा होईल.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्र सरकारने रेल्वेच्या विकास कार्यावर अधिक पैसे खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सरकारने आणखी चांगल्या सुविधा करण्याचा विचार केला आहे. त्यासोबत रेल्वेचे डिजिटलायजेशनकडे पाऊल टाकलं. केंद्र सरकारने मागील वर्षी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीमुळे कर्ज फेडण्याची मुदत मिळाली. तसेच या अर्थसंकल्पातील निधीचा वापर रेल्वेच्या सुविधांसाठी देखील करण्यात येणार आहे. तसेच या अर्थसंकल्पातील निधीचा वापर हा ट्रेनचा विस्तार, नवी ट्रेन बनवणे आणि मेट्रो स्टेशन बनवण्यात येत आहे. नव्या सुविधेमुळे रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ देखील झाली.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, ‘आधी रेल्वेला विकासकामांसाठी कर्ज घ्यावे लागत होते. परंतु मोदी सरकारच्या राज्यात कर्ज घेण्याची गरज लागणार नाही. कारण अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे कर्ज देखील फेडलं गेलं आहे. नव्या ट्रेन व्यतिरिक्त रेल्वे सुविधा देखील मिळाल्या आहेत. रेल्वेने आतापर्यंत जवळपास 93 हजार कोटींच व्याज फेडलं आहे. त्याचबरोबर अंदाजे 1 लाख कोटी रुपयांची मुद्दल देखील फेडली आहे. कोरोनाच्या काळात रेल्वेला केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून 79000 कोटी रुपये कर्ज घ्यावे लागले होते. तसेच आधी घेतलेल्या कर्जाचीही परतफेड करण्यात आली आहे. दुसरीकडे आता केंद्र सरकार रेल्वेसाठी आणखी सुविधा आखण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील रेल्वे स्टेशनचा विस्तार करण्याचे काम जलदगतीने सुरू आहे. आता कर्ज फेडल्यानंतर रेल्वेकडून आणखी कोणत्या सुविधा मिळणार आहे, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
