मंदिर वहीं बनाएंगे.. ‘या’ व्यक्तीने लिहिलं होतं घोषवाक्य; जे बनलं राम मंदिर आंदोलनाचं प्रतीक
Who wrote the slogan Mandir Wahi Banayege? Ram Mandir Inauguration Update : अयोध्येतील राम मंदिराचं आज उद्घाटन होत आहे. हे मंदिर उभं राहण्यामागे मोठा लढा आहे. मोठं आंदोलन झालं. या आंदोलनाती 'मंदिर वहीं बनायेंगे' या घोषवाक्य कुणी लिहिलं? पाहा...

अयोध्येतील राम मंदिराचं आज उद्घाटन आज होतंय. या सोहळ्याला असंख्य रामभक्त अयोध्येत दाखल झालेत. राम मंदिर उभं राहण्यामागे मोठा लढा आहे.

राम मंदिर आंदोलनातील 'राम लल्ला हम आयेंगे मंदिर वहीं बनायेंगे' हे घोषवाक्य कुणी लिहिलं? हे तुम्हाला माहिती आहे का?

मूळ मध्यप्रदेशमधील असलेल्या बाबा सत्यनारायण मौर्य यांनी पहिल्यांचा ही घोषणा दिली आहे. मौर्य यांनी 1986 साली त्यांनी ही घोषणा दिली. तेव्हा ते केवळ 22 वर्षांचे आहेत.

मध्यप्रदेशमधील उज्जैनमध्ये त्यांनी पहिल्यांदा ही घोषणा दिली. मोर्य हे पेंटर आहेत. कार सेवेसाठी गेलेले असताना अयोध्येमधील भिंतीवर त्यांनी ही घोषणा लिहिली.

अयोध्यतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात 6 हजार व्हीआयपी लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यातील एक म्हणजे बाबा सत्यनारायण मौर्य आहे. पंतप्रधान मोदी त्यांना व्यक्तिगतरित्या ओळखतात. आजच्या या सोहळ्याला मोर्य हजर आहेत.