
ही बाब अभिमानास्पद : शेतकऱ्यांकडे काही नसले तरी आपली हक्काची बैलजोडी ही असतेच. त्याचा कायम अभिमान वाटायला हवा. आज आनंदाचा दिवस असल्याने आपल्या आनंदात बैलजोडीचाही सहभाग महत्वाचा आहे. शिवाय वाढत्या इंधन दरवाढीचा ज्वलंत प्रश्न असल्याने गावचे वऱ्हाड बैलगाडीतून आणले असल्याचे विशालने सांगितले.

एकच चर्चा: 10 किमी प्रवास करुन नवरदेवासह हे वऱ्हाड लग्न मंडपी पोहचल्यानंतर या अनोख्या पध्दतीची एकच चर्चा सुरु झाली आहे. आज-काल मोठ-मोठ्या अलिशान गाड्यांमधून वरात काढली जाते पण बैलगाडीतून निघालेल्या वरातीची चर्चा अनकवाडीत रंगली होती.

खर्चही टळला : लग्न म्हटलं तर, अवाढव्य खर्च सगळे करताना आपण पाहत असतो. मात्र या महागाईच्या युगात शेतकऱ्याचं घरच लग्न हे अगदी साध्या पद्धतीने होत असल्याचे दिसून येते. सध्या या अनोख्या वरातीची चर्चा संपूर्ण अमरावती होत आहे इंधन दरवाढीवरून या शेतकऱ्याच्या मुलाने नामी उपाय शोधला आहे.

बैलगाडीतून 10 किमीचा प्रवास: वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी शिरजगाव येथील विशाल कांबळे यांनी थेट बैलगाडीतून वऱ्हाड लग्न स्थळी मार्गस्थ केले होते. शिरजगाव ते अनकवाडी हा 10 किमीचा प्रवास बैलगाडी केल्याने हे वऱ्हाड अनेकांचे लक्ष वेधून घेत होते.