
अण्वस्त्र हल्ला झाल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम होत असतात. अण्वस्त्र हल्ल्यामुळे जीवीत आणि मोठ्या प्रमाणावर वित्त हानी होते. परंतु अण्वस्त्र हल्ल्यानंतर पाऊस पडतो. या पावसाचा प्रत्येक थेंब विषारी असतो. अण्वस्त्र हे त्याच्या स्फोटक क्षमतेपेक्षा जास्त धोकादायक असतात.

अणू बॉम्बचा स्फोटानंतर रेडिएशनचा धोका वाढतो. अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणू बॉम्ब टाकले होते. त्यावेळी अनेक जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी 80,000 हजारापेक्षा जास्त व्यक्तीचा त्वरीत मृत्यू झाला होता.

अणू बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होता. त्यानंतर पाऊस पडतो. हा पाऊस रेडिओधर्मी असतो. त्याला काळा पाऊससुद्धा म्हटला जातो. या पावसाचा प्रत्येक थेंब विषासारखा असतो.

अणू बॉम्बच्या स्फोटानंतर पडणार पाऊस खूप धोकादायक असतो. त्यामध्ये रेडिओएक्टिव कण, धूळ आणि राखेचे तत्व असतात. हा पाऊस काळा असतो. या पावसाचे थेंब अंगावर पडल्यावर जळजळ होत असते. वनस्पतींसाठीही हा पाऊस घातक असतो.

अण्वस्त्रानंतर पडणाऱ्या काळ्या पावसामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो. तसेच या काळ्या पावसाचे परिणाम अनेक वर्षांपर्यंत दिसून येतात. यामुळे अण्वस्त्र हल्ला हा घातक असतो. जगात अमेरिकेशिवाय अजून कोणीही अण्वस्त्राचा वापर केला नाही. भारताने प्रथम अण्वस्त्र हल्ला न करण्याचे बंधन स्वत:वर घातले आहे.