आयुष्यात लग्न का गरजेचे आहे? शास्त्रात जे सांगितलंय त्याने…वाचून तुम्हालाही वाटले आश्चर्य!
विवाहाला स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीशी जोडण्यात आलेले आहे. गरुड पुराणानुसार विवाह हा स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे. लग्नानंतर माणूस ग्रहस्थाश्रमात प्रवेश करतो.

विवाह हा हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. विवाह म्हणजे ग्रहस्थाश्रमाची पहिली पायरी मानले जाते. विवाहाबद्दल गरुड पुरुणात खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे.

विवाहाला स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीशी जोडण्यात आलेले आहे. गरुड पुराणानुसार विवाह हा स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे. लग्नानंतर माणूस ग्रहस्थाश्रमात जातो. या स्थितीत माणूस देव, देवता, ऋषीमुनींची पूजा करून स्वर्गात स्थान मिळवू शकतो, असे सांगितले जाते.

म्हणूनच विवाह हा खूप महत्त्वाच असल्याचे मानले जाते. अनेकदा विवाह न करू मी स्वत:ला शुद्ध ठेवतो आहे, असे अनेकांना वाटते. परंतु कर्म शास्त्रात सांगितलेल्या कर्माना न केल्याने एका प्रकारे पापच लागते.

विवाह केल्याने आपल्याला वंशप्राप्ती होते. वंश पुढे नेता येतो. म्हणूनही आयुष्यात विवाह खूप महत्त्वाचा आहे, असे मानले जाते. अनुरूप मुलगी मिळाल्यास विवाह करणे योग्य असते, असे शास्त्रात सांगितलेले आहे.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.