लोक मृतदेहाजवळ रात्रभर बसून का राहतात? पहारा का दिला जातो? वाचून धक्का बसेल!
हिंदू धर्मात मृतदेहाला कधीच एकटं सोडलं जात नाही. रात्र झाली की त्या मृतदेहाच्या आजूबाजूला लोक बसतात. धार्मिक परंपरेत रात्री मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे चुकीचे मानले जाते. म्हणूनच अनेकदा मृतदेह रात्रभर घरात ठेवून दिला जातो.

मृत्यू ही एक अटळ अशी घटना आहे. जो जन्माला आला त्याचा एक दिवस मृत्यू होतोच. मृत्यूनंतर मृतदेहाबाबत आपल्या समाजात अनेक श्रद्धा-अंधश्रद्धा आहेत. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की संबंधित मृतदेहाची विटंबना होऊ नये याची नेहमी काळजी घेतली जाते.

हिंदू धर्मात मृतदेहाला कधीच एकटं सोडलं जात नाही. रात्र झाली की त्या मृतदेहाच्या आजूबाजूला लोक बसतात. धार्मिक परंपरेत रात्री मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे चुकीचे मानले जाते. म्हणूनच अनेकदा मृतदेह रात्रभर घरात ठेवून दिला जातो.

जेव्हा मृतदेह घरात ठेवला जातो, तेव्हा कुटुंबातील एखादा सदस्य त्या मृतदेहाजवळ बसून पहारा देत असतो. जोपर्यंत मतदेहावर अंत्यसंस्कार होत नाहीत, तोपर्यंत त्याच्या आजूबाजूला संबंधित व्यक्तीचा आत्मा भटकत असते, अशी अंधश्रद्धा आहे. म्हणूनच काही लोक मृतदेहाला पहारा देतात.

म्हणूनच मृतदेहाशेजारी दिवा, धुपबत्ती, अगरबत्ती लावली जाते. सकारात्मक उर्जा कायम राहावी म्हणून तसे केले जाते. दुसरीकडे पूर्वीच्या काळात खुल्या अंगणात मृतदेह ठेवला जायचा अशा वेळी जंगलातील हिंस्त्र प्राणी त्या मृतदेहावर हल्ला करण्याची शक्यता असायचाी म्हणूनच लोक मृतदेहाला पहारा द्यायचे.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.