Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलेलं नाही, सामनातून हल्लाबोल

शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या पात्र अपात्रतेबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन असताना सुद्धा या आमदारांना मतदानात भाग घेऊ दिला गेला जे बेकायदेशीर होतं.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलेलं नाही, सामनातून हल्लाबोल
Uddhav ThackerayImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 7:41 AM

मुंबई: शिंदे गटातील (Shinde Group) आमदार कडक सुरक्षेसह गोव्यातून मुंबईत आले. अगदी कुलाब्याच्या त्यांच्या हॉटेलपर्यंत त्यांना केंद्राकडून सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. इतकी कडक सुरक्षा कधीच कुणासाठी नव्हती असंही काल शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. आज याच बाबतीत शिवसेनेच्या सामना (Samana Shivsena) मधून घणाघात करण्यात आलेले आहेत. जेव्हापासून उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे तेव्हापासून महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलेलं नाही. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या पात्र अपात्रतेबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन असताना सुद्धा या आमदारांना मतदानात भाग घेऊ दिला गेला जे बेकायदेशीर होतं. कसाबच्या सुरक्षेसाठी देखील इतका पोलीस बंदोबस्त नव्हता जितका या शिंदे गटातील आमदारांसाठी कडक बंदोबस्त होता शिवाय हवाई दल आणि सैन्यच तेवढं वापरायचं बाकी होतं असंही सामनात म्हटलंय.

महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलेलं नाही

शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या पात्र अपात्रतेबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन असताना या आमदारांना मतदानात भाग घेऊ देणे बेकायदेशीर आहे, पण उद्भव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही. सुरत, गुवाहाटी, गोवा, मुंबई असा मोठा प्रवास करून शिंदे गटाचे आमदार मुंबई विमानतळावर उतरले तेव्हा विमानतळापासून कुलाब्यातील त्यांच्या हॉटेलपर्यंत सुरक्षेसाठी हजारो केंद्रीय जवान दुतर्फा बंदुका घेऊन उभे होते. फक्त हवाई दल आणि सैन्यच वापरायचे काय ते बाकी होते. कसाबच्या सुरक्षेसाठी सुद्धा इतके पोलीस नव्हते, पण महाराष्ट्र हा शहीद स्वाभिमानी तुकाराम ओंबाळेंचा आहे, हे शिंदे गटाच्या आमदारांनी विसरू नये.

कशासाठी एवढा बंदोबस्त? आदित्य ठाकरेंचा सवाल

विधानभवन परिसरातील सुरक्षेवरून शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. सरकार तुमचं आहे. पोलीस तुमच्या हातात आहे. तरीही तुम्हाला भीती एवढी कशाची आहे? कसाबला पकडलं तेव्हा त्यालाही एढी सुरक्षा दिलेली नव्हती. एवढी सुरक्षा बंडखोरांना द्यायला भीती कशाची आहे? मला वाईट एवढंच वाटतं की त्यांना बसमधून आणलं गेलं. मला वाटत नाही की कधीही असं कोणत्याही अतिरेक्यांना एवढा बंदोबस्त लावून आणलं असेल. कसाबलाही आणलं नसेल. कशासाठी एवढा बंदोबस्त? कोण पळणार आहे की कोण काय करणार आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. सरकारचा एवढा बंदोबस्त असताना आणि विधानभवनाच्या परिसरात एवढा कडेकोट बंदोबस्त असताना एवढा बंदोबस्त का? कसाबच्या वेळीही मुंबईत एवढा बंदोबस्त पाहिला नव्हता, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.