यावेळी वाराणसीतून मोदींविरोधात लढणार नाही, केजरीवालांची माघार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

नवी दिल्ली : आम आदमी पार्टी म्हणजेच आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढणार नाहीत. 2014 ला केजरीवालांनी वाराणसीतून पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढली होती. आप यावेळी उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणूक लढणार आहे, मात्र केजरीवाल लढणार नाहीत, असं आपचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी स्पष्ट केलंय. अरविंद केजरीवाल सध्या […]

यावेळी वाराणसीतून मोदींविरोधात लढणार नाही, केजरीवालांची माघार
Follow us on

नवी दिल्ली : आम आदमी पार्टी म्हणजेच आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढणार नाहीत. 2014 ला केजरीवालांनी वाराणसीतून पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढली होती. आप यावेळी उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणूक लढणार आहे, मात्र केजरीवाल लढणार नाहीत, असं आपचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी स्पष्ट केलंय.

अरविंद केजरीवाल सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री असल्यामुळे लोकसभा निवडणूक लढण्याची कोणतीही योजना नाही. पक्षाचं संघटन ज्या ठिकाणी मजबूत आहे, तिथे आपचा उमेदवार दिला जाईल. फेब्रुवारी अखेरपर्यंत उत्तर प्रदेशातील उमेदवारांचा निर्णय होईल, अशी माहितीही संजय सिंग यांनी दिली. वाचावाराणसीतून मोदींविरोधात हार्दिक पटेल मैदानात?

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी वाराणसी आणि गुजरातमधील लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्हीही ठिकाणांहून त्यांचा विजय झाला होता. वाराणसी लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. 2004 सालचा अपवाद वगळता 1991 पासून या मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे. 2009 साली इथून भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी विजय मिळवला होता.

2014 च्या निवडणुकीत मोदींना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टक्कर दिली होती. मोदींनी त्यावेळी 581022 म्हणजेच तब्बल 56 टक्क्यांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला होता. तर अरविंद केजरीवाल यांनी 209238 मतं मिळवली होती. इतर पक्षांच्या उमेदवाराचा सुपडासाफ झाला होता. काँग्रेसचे अजय राय यांना 75614, सपा उमेदवाराला 45 हजार, बसपा उमेदवाराला 60 हजार मतं मिळाली होती. मोदींनी जवळपास पावणे चार लाख मतांनी 2014 ला विजय मिळवला होता.