AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाराणसीतून मोदींविरोधात हार्दिक पटेल मैदानात?

नवी दिल्ली : केंद्रात सत्ता मिळवण्याचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो. कारण, तब्बल 80 जागा या राज्यात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः वाराणसी या मतदारसंघातून 2014 ला निवडून आले होते. यावेळी मात्र त्यांच्यासमोर गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल उभा असेल अशी माहिती आहे. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाकडून हार्दिक पटेलला उमेदवारी दिली जाणार असल्याचं […]

वाराणसीतून मोदींविरोधात हार्दिक पटेल मैदानात?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM
Share

नवी दिल्ली : केंद्रात सत्ता मिळवण्याचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो. कारण, तब्बल 80 जागा या राज्यात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः वाराणसी या मतदारसंघातून 2014 ला निवडून आले होते. यावेळी मात्र त्यांच्यासमोर गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल उभा असेल अशी माहिती आहे. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाकडून हार्दिक पटेलला उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जातंय. 2014 च्या निवडणुकीत मोदी या मतदारसंघातून विक्रमी मतांनी निवडून आले होते.

उत्तर प्रदेशात सपा आणि बसपाने एकत्र येत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. शनिवारी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची घोषणा केली जाणार आहे. दोन्ही पक्ष प्रत्येकी 37-37 जागा लढणार असल्याची माहिती आहे. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासाठी रायबरेली आणि अमेठी मतदारसंघात सपा-बसपा उमेदवार देणार नाही. रायबरेली आणि अमेठी हे काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ आहेत.

सपा आणि बसपाने आरजेडीसाठीही दोन जागा सोडल्या आहेत. पण आरजेडीची आणखी जागांची मागणी आहे. याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याची शक्यता आहे. सपा आणि बसपा काँग्रेसला सोबत घेणार नसल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे काँग्रेसला स्वबळावरच निवडणूक लढावी लागणार आहे.

सपा-बसपा एकत्र आल्यास वाराणसीत काय फरक पडेल?

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी वाराणसी आणि गुजरातमधील लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्हीही ठिकाणांहून त्यांचा विजय झाला होता. वाराणसी लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. 2004 सालचा अपवाद वगळता 1991 पासून या मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे. 2009 साली इथून भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी विजय मिळवला होता.

2014 च्या निवडणुकीत मोदींना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टक्कर दिली होती. मोदींनी त्यावेळी 581022 म्हणजेच तब्बल 56 टक्क्यांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला होता. तर अरविंद केजरीवाल यांनी 209238 मतं मिळवली होती. इतर पक्षांच्या उमेदवाराचा सुपडासाफ झाला होता. काँग्रेसचे अजय राय यांना 75614, सपा उमेदवाराला 45 हजार, बसपा उमेदवाराला 60 हजार मतं मिळाली होती. मोदींनी जवळपास पावणे चार लाख मतांनी 2014 ला विजय मिळवला होता.

गेल्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी मोठ्या प्रमाणात मतांचं विभाजन केलं, ज्याचा फायदा भाजपला झाला होता. कारण, सपा आणि बसपाची मतं विभागली गेली. परिणामी काही हजारांमध्ये सपा आणि बसपाला मतं मिळाली. 2014 च्या आकडेवारीनुसार सपा आणि बसपाची मतं एक लाखांहून अधिक होतात. त्यांना काँग्रेसने साथ दिली तरी हा आकडा दीड लाखांच्या पुढे जाईल. हार्दिक पटेलला जिंकून आणण्यासाठी काँग्रेस, सपा आणि बसपा एकत्र येऊ शकतात. पण तिन्ही पक्षांची मतं मिळूनही मोदींच्या जवळ जात नाहीत. 2014 ला मोदी लाट होती. यावेळी चित्र कसं असेल त्यावर निकाल अवलंबून आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं