AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खैरेंविरोधात एल्गार, असदुद्दीन ओवेसी औरंगाबादेत चार दिवस तळ ठोकणार

औरंगाबाद : शिवसेनेचे औरंगाबादचे उमेदवार आणि विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा पाचव्यांदा संसदेत जाण्याचा मार्ग दिवसेंदिवस खडतर होतोय. एमआयएमने या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी औरंगाबादेत चार दिवस मुक्कामी असतील. या काळात ते कॉर्नर बैठका, घरोघरी जाऊन भेटी, रॅली आणि प्रचारसभाही घेणार आहेत. एमआयएम आणि भारिप यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबादेतून एमआयएमचे […]

खैरेंविरोधात एल्गार, असदुद्दीन ओवेसी औरंगाबादेत चार दिवस तळ ठोकणार
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM
Share

औरंगाबाद : शिवसेनेचे औरंगाबादचे उमेदवार आणि विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा पाचव्यांदा संसदेत जाण्याचा मार्ग दिवसेंदिवस खडतर होतोय. एमआयएमने या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी औरंगाबादेत चार दिवस मुक्कामी असतील. या काळात ते कॉर्नर बैठका, घरोघरी जाऊन भेटी, रॅली आणि प्रचारसभाही घेणार आहेत. एमआयएम आणि भारिप यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबादेतून एमआयएमचे विद्यमान आमदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नांदेडमध्ये सभा घेतल्यानंतर ओवेसी औरंगाबादचा दौरा सुरु करणार आहेत. मंगळवारी रात्रीच ते कार्यकर्त्यांशीही संवाद साधणार आहेत. 16 ते 19 एप्रिल या काळात ओवेसींकडून प्रचार केला जाईल. एमआयएमचा मतदार असलेला मुस्लीम समाज औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. औरंगाबाद महापालिकेत एमआयएमने घवघवीत यश मिळवलं होतं. पण ग्रामीण भागातलं चित्र कसं असेल याबाबत अस्पष्टता आहे.

चंद्रकांत खैरेंसमोरच्या अडचणी वाढल्या

शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना औरंगाबादेत अपक्ष, काँग्रेस आणि एमआयएमचं आव्हान असेल. कारण, अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी पाठिंबा दिलाय, शिवाय वेरुळ मठाच्या शांतीगिरी महाराजांनीही हर्षवर्धन जाधवांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात जाधव यांनी सक्रिय भूमिका घेतली होती. त्यानंतरच शिवसेनेतून बाहेर पडत त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेसकडून मोठी टक्कर मिळण्याची शक्यता नसली तरी एमआयएम मात्र तगडं आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे.

औरंगाबादसाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 23 एप्रिल रोजी मतदान होईल. या टप्प्यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 14 जागांसाठी मतदान होणार आहे.

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.