AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: पत्रिकेतील कोणत्या ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे होते शारीरिक, मानसीक आणि आर्थिक हानी? काय आहेत यावर उपाय?

ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या अपघातासाठी सूर्य आणि चंद्र हे सर्वात जबाबदार ग्रह मानले जातात. यानंतर राहू, मंगळ आणि शनी यांची नावे येतात.

Astrology: पत्रिकेतील कोणत्या ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे होते शारीरिक, मानसीक आणि आर्थिक हानी? काय आहेत यावर उपाय?
ज्योतिषशास्त्रImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 07, 2023 | 5:54 PM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रामध्ये (Astrology) देश आणि जगासह सामान्य माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना आणि अपघातांना ग्रह जबाबदार मानले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्र बदलल्याने चढ-उताराची परिस्थिती निर्माण होते. माणसाच्या जिवनात ही हानी शारीरिक, आर्थिक आणि मानसिकही असू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या अपघातासाठी सूर्य आणि चंद्र हे सर्वात जबाबदार ग्रह मानले जातात. यानंतर राहू, मंगळ आणि शनी यांची नावे येतात.

ग्रहांची अशी स्थिती असल्यास करावा लागतो समस्यांचा सामना

1. व्यक्तीच्या कुंडलीत शनि, राहू आणि मंगळाची स्थिती योग्य नसल्यास वाहन अपघात होतात.

2. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी सती आणि धैयाची स्थिती असेल तर शनीच्या प्रभावामुळे अपघात होतो.

3. राशीच्या राशीचा स्वामी अशक्त असेल तर शारीरिक नुकसान होते.

4. कुंडलीत मरक दशा असेल तर मृत्यू होतो. अन्यथा वाहनाचेच नुकसान होते.

हे ग्रह आहेत आर्थिक हानीसाठी जबाबदार

1. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती खराब असेल तर आर्थिक हानी होण्याची शक्यता असते.

2. कुंडलीत मंगळ खराब असेल तर व्यक्ती कर्जात बुडतो.

3. कुंडलीत राहुच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्ती राजाचा  रंक होतो.

हे ग्रह नातेसंबंधातील समस्यांसाठी आहेत जबाबदार

1. चंद्र आणि शुक्र संबंधांमध्ये अचानक समस्या निर्माण करतात

2. कुंडलीतील राहूची अशुभ स्थिती नातेसंबंध बिघडवते.

3. कुंडलीत मंगळाच्या अशुभ स्थितीमुळे घटस्फोटासारख्या समस्यांना समोर जोवे लागते.

ग्रहांचा अशुभ प्रभाव आणि त्यावरचे उपाय

सूर्य- कुंडलीत सूर्य अशुभ असल्यास हृदयविकार, डोळ्यांचे आजार, धनहानी, खोटे आरोप आणि मान-सन्मान कमी होतो. उपाय- रविवारी सूर्योदयाच्या वेळी जल अर्पण करून एखाद्या गरीब व्यक्तीला दान केल्याने सूर्याचा अशुभ प्रभाव कमी होतो.

चंद्र- चंद्र अशुभ असताना मानसिक तणाव, चिंता, फुफ्फुसाचे आजार आणि पैशाची कमतरता. उपाय- चंद्राचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी चंद्राला दूध, दही, तांदूळ, पांढरी फुले, पांढरे चंदन आणि कापूर दान करा.

मंगळ- मंगळ अशुभ असेल तेव्हा हृदयविकार, कर्जाच्या समस्या आणि जमीन-संपत्तीसंबंधी वाद निर्माण होऊ लागतात. उपाय- मंगळाचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी लाल वस्त्र दान करा.

बुध- बुधाच्या अशुभतेमुळे दातांचे विकार होऊ लागतात आणि कुटुंबात कलह निर्माण होतात. उपाय- बुध ग्रहाचा प्रभाव कमी करण्यासाठी हिरव्या वस्तूंचे दान करा.

गुरु- जेव्हा गुरु अशुभ असतो तेव्हा त्याला स्वतःच्या मुलाकडून त्रास होऊ लागतो. शिक्षणात अडचणी येऊ लागतात. वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण होतात. उपाय- बृहस्पतिचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी पिवळे कपडे आणि पुस्तके इत्यादी दान करावे.

शुक्र – शुक्र ग्रहाला सौंदर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे. जेव्हा शुक्र अशुभ असतो तेव्हा वैवाहिक सुखात घट होते. उपाय- मातेच्या मंदिरात जाऊन लाल चुनरी अर्पण करा. शुक्राचा अशुभ प्रभाव कमी राहील.

शनि- शनिच्या अशुभतेमुळे जाळपोळ, अपघात, डोळ्यांचे आजार आणि पित्यापासून दुरावण्याची समस्या निर्माण होऊ लागते. उपाय- तेल, मोहरी, काळे तीळ, काळे कपडे, बूट इत्यादी दान करणे शुभ राहील.

राहू- राहू अशुभ असेल तेव्हा डोके दुखू लागते. मानसिक आणि प्रत्येक कामात अडचणी निर्माण होतात. उपाय- राहूचा प्रभाव कमी करण्यासाठी कुष्ठरोग्यांना वस्त्र दान करावे.

केतू- केतूच्या अशुभतेमुळे विश्वासघाताचे शिकार व्हावे लागेल. उपाय- नारळ आणि उडीद डाळ इत्यादी दान केल्याने केतू ग्रहाला शांती मिळते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.