AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Elections | औरंगाबाद महापालिका निवडणूकीच्या सुनावणीची तारीख आणखी पुढे, सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी?

एप्रिल 2019 मध्ये महापालिकेची मुदत संपली आहे. मात्र कोरोना संकटामुळे निवडणूक लांबणीवर पडली असून महापालिकेवर सध्या प्रशासक आहेत.

Elections | औरंगाबाद महापालिका निवडणूकीच्या सुनावणीची तारीख आणखी पुढे, सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी?
औरंगाबाद महापालिका
| Updated on: Mar 01, 2022 | 4:04 AM
Share

औरंगाबादः राज्यातील विविध शहरांच्या महापालिका निवडणुकांची (Aurangabad Municipal Corporation) प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानिमित्ताने राजकीय वातावरणही खूप तापले आहे. अनेक ठिकाणी प्रभाग रचना जाहीर झाली आहे. सुनावणी आणि हरकत मागवण्याची प्रक्रियाही पार पडत आहे. त्यानुसार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक कामालाही लागले आहेत. मात्र औरंगाबाद महापालिकेसंदर्भातली एक याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित असल्यामुळे येथील निवडणूक प्रक्रियेला म्हणावा तेवढा वेग येत नाहीये. राजकीय पक्षांनी आपापल्या स्तरावर मोर्चेबांधणी सुरु केली असली तरीही तांत्रिक प्रक्रियेत ही निवडणूक अडकल्यामुळे इच्छुकांना (Aurangabad politics) सध्या शांत बसण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. येत्या 3 मार्च रोजी सदर प्रलंबित याचिकेवर सुनावणी होणार असा अंदाज होता. मात्र ही तारीख आता 30 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती याचिकाकर्ते समीर राजूरकर यांनी दिली आहे.

काय आहे याचिका?

औरंगाबाद महापालिकेने 2015 मध्ये घेतलेल्या निवडणुकीत प्रभाग रचना अत्यंत विस्कळीत आणि राजकीय पक्षांच्या सोयीनुसार केल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला होता. त्यामुळे यानंतर महापालिकेची जी निवडणूक होईल, त्यात अत्यंत पारदर्शक पद्धतीने प्रभाग रचना केली जावी, याकरिता समीर राजुरकर, सुरेश गवळी, उमाकांत दीक्षित आणि अनिल विधाते यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर 6 ऑक्टोबर 2020 रोजी जैसे आदेश मिळाले. एप्रिल 2019 मध्ये महापालिकेची मुदत संपली आहे. मात्र कोरोना संकटामुळे निवडणूक लांबणीवर पडली असून महापालिकेवर सध्या प्रशासक आहेत. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने बहुसदस्यीच प्रभाग रचनेचा अध्यादेश काढल्याने ही संपूर्ण याचिकाच निरस्त करण्याची विनंती निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र याचिका निरस्त म्हणून निकाली न काढता नव्याने राबवण्यात येणाऱ्या प्रभागरचना व आरक्षण प्रक्रियेत नियमांचे पालन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगास द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. या प्रकरणावर येत्या 3 मार्च रोजी सुनावणी होणार होती.

पुढील सुनावणीची तारीख काय?

सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख 3 मार्च ही कॉम्प्यूटरद्वारे जनरेट झाली होती. मात्र पुन्हा एकदा कॉम्प्यूटरद्वारे ही तारीख 30 मार्च रोजी झाल्याचे याचिकाकर्ते समीर राजूरकर यांनी सांगितले. ही तारीख लागल्यानंतर रजिस्ट्रारमार्फत बोर्डावर प्रकरण लावण्यात आले तरच सुनावणी होते. त्यामुळे पुढील महिनाभर तरी औरंगाबाद महापालिकेसंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी होणार नाही, अशी चिन्ह आहेत.

इतर बातम्या-

Indapur | इंदापूरमध्ये छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यासाठी ‘निमसाखर’ गाव एकवटले; घेतला ‘हा’ निर्णय

Kurla Balcony Collapsed : कुर्ल्यात शॉपिंग सेंटरचा छज्जा कोसळून पाच वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.