AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Imtiaz Jaleel | औरंगाबादेत पुढचा महापौर एमआयएमचा, खा. इम्तियाज जलील यांचं मोठं वक्तव्य, भाजपसहित शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीवर चौफेर टीका

शहराचं नावं राजकीय फायद्यासाठी बदलायचं आहे. मुसलमान औरंगजेबाला फॉलो करत नाहीत. इतिहासाचा तो एक भाग आहे. तुम्ही इतिहासाचं पान फाडू शकता पण इतिहास बदलू शकत नाहीत, असं वक्तव्य खा. जलील यांनी केलं.

Imtiaz Jaleel | औरंगाबादेत पुढचा महापौर एमआयएमचा, खा. इम्तियाज जलील यांचं मोठं वक्तव्य, भाजपसहित शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीवर चौफेर टीका
खासदार इम्तियाज जलीलImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 05, 2022 | 1:40 PM
Share

औरंगाबादः औरंगाबाद महापालिकेत (Aurangabad municipal Corporation) पुढचा महापौर एमआयएमचाच (MIM) होणार, असं मोठं वक्तव्य खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केलं आहे. दिल्लीत आज त्यांनी टीव्ही9 शी बोलताना हे वक्तव्य केलं. मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. भाजपनेच शिवसेनेत भांडणं लावून दिली असून मुंबई महापालिका मिळाल्यानंतर भाजपचे खरे मनसुबे उघडले पडतील, असं वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केलंय. एमआयएम टीआरपी मिळवण्यासाठी बोलतो , एमआयएम ही भाजपची बी टीम असे आरोप वारंवार केले जातात. मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यातही अब्दुल सत्तार यांनी असे आरोप केले होते. त्याला खा. जलील यांनी प्रत्युत्तर दिलंय. औरंगाबादच्या नामांतराला आजही विरोध असून केवळ राजकीय फायद्यासाठी शहराचं नामांतर होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय.

‘काँग्रेस-राष्ट्रवादी गरजेनुसार सेक्युलर’

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना इम्तियाज जलील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे गरजेनुसार, सेक्युलर होतात. मात्र राजकारण करायचं असतं तेव्हा एमआयएमवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो. मात्र आता मुस्लिमांचा मोठा व्होट बँक काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून दूर गेलाय, असं वक्तव्य त्यांनी केलं. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत बैठकीला बोलावलं म्हणून मी आलो. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतल्याची माहितीही खा. जलील यांनी दिली.

‘भाजपाला फक्त मुंबई हवीय’

भाजप आणि शिंदे सेनेच्या महायुतीवर बोलताना खा. जलील म्हणाले, भाजपा फक्त शिवसेनेचा उपयोग करत आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवणे, हाच त्यांचा उद्देश आहे. एकदा का मुंबईवर कब्जा झाला की ते कोणाला कुठे सोडून देतील माहिती नाही. भाजपला शिवसेनेत दोन गट पाडायचे होते. मुंबई महापालिका भाजपला घ्यायची आहे. त्यासाठी त्यांनी शिवसेनेत भांडणं लावलीत. आणि त्यात भाजपा यश मिळालं आहे.

‘अब्दुल सत्तार फुकटचे भपके’

अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी एमआयएमवर टीका केली होती. त्याला उत्तर देताना खा. जलील म्हणाले, ‘ अब्दुल सत्तार फूकटाचे भपके आहेत. आम्ही त्यांना काडीचीही किंमत देत नाहीत.

‘औरंगाबादचा इतिहास बदलू शकणार नाहीत’

संभाजीनगर नामांतरावरून बोलताना खा. जलील म्हणाले, ‘ संभाजीनगर नामांतर करण्यास आजही माझा विरोध आहे. संभाजी राजेंबद्दल माझ्या मनात आदर आहे. ज्या शहरात आठ आठ दिवस पाणी मिळत नाही, शहराचं नावं राजकीय फायद्यासाठी बदलायचं आहे. मुसलमान औरंगजेबाला फॉलो करत नाहीत. इतिहासाचा तो एक भाग आहे. तुम्ही इतिहासाचं पान फाडू शकता पण इतिहास बदलू शकत नाहीत, असं खा. जलील यांनी सांगितलं.

‘तिरंगा डीपीत नाही तर रक्तात आहे’

हर घर तिरंगा मोहिमेत प्रत्येकाने आपापल्या डीपीत तिरंगा लावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यावर खा. जलील यांनी सणकून टीका केली. ‘ तुमच्या आणि माझ्या पैशातून नरेंद्र मोदी पब्लिसिटी करतायेत. आम्ही झेंडा डीपीवर लावत नाहीत. तिरंगा आमच्या रक्तात आहे. लसीकरणावरही मोदींचा फोटो आहे. घरावर झेंडा नाही लावला तर तुम्ही देशद्रोही ठरवणार का? माझ्या घरावर बघायला येतील त्यांनी झेंडा लावला की नाही… 2014 पासून 15 ऑगस्टला मी तिरंगा यात्रा काढतो त्याची प्रेरणा नरेंद्र मोदींनी घेतली. मुसलमानही टोपी घालून तिरंगा गाडीवर लावून फिरतो… असं खा. जलील यांनी ठणकावून सांगितलं.

Follow Us
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार.
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका.
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी.
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?.
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या.
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?.
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या.
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल.
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर.