AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस = फडण दोन शून्य, बालभारतीचा वाद, अजित पवारांचंही सरकारला गणित

बालभारतीच्या दुसरीच्या गणिताच्या पुस्तकावरुन राज्यभर वादंग उठला आहे. बालभारती पुस्तकातील अंकवाचनातील बदलामुळे सरकारवर टीका होत आहेत.

फडणवीस = फडण दोन शून्य, बालभारतीचा वाद, अजित पवारांचंही सरकारला गणित
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jun 19, 2019 | 7:08 PM
Share

मुंबई : बालभारतीच्या दुसरीच्या गणिताच्या पुस्तकावरुन राज्यभर वादंग उठला आहे. बालभारती पुस्तकातील अंकवाचनातील बदलामुळे सरकारवर टीका होत आहेत. एकवीसऐवजी वीस एक, एकसष्ठऐवजी 60 एक अशी नवी पद्धती अवलंबण्यात येणार आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारला प्रश्न विचारला. अजित पवारांनी विधानसभेत एक मोबाईलनंबर वाचला. ते म्हणाले, “98220 अशी मोबाईल नंबरची सुरुवात असेल,  तर तो नंबर नव्वद आठ असा सांगितला तर लिहिणारा 908 असं लिहील. त्यामुळे सगळा गोंधळात गोंधळ आहे”

यावेळी अजित पवारांनी बालभारती वादावरुन सरकारवर हल्ला चढवला. “मोदीसाहेबांच्या नावावर निवडून येताहेत, डोकीच चालवत नाहीत. आपल्याला एकवीस, बावीस, त्र्यानव, चौऱ्यान्नव असं शिकवलं आहे, मग तुम्ही हे काय काढलं आहे?  तुम्ही सगळे सीनियर मंत्री आहात, याबाबत कुणीतरी सिरीयस घ्या”, असं अजित पवार म्हणाले.

फडणवीस, बावनकुळे कसं लिहायचं?

दरम्यान, बालभारतीच्या या नव्या प्रयोगामुळे सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेज फिरत आहेत. बालभारती जर एकवीसला वीस एक, बावन्नला पन्नास दोन म्हणायला सांगत असेल, तर फडणवीस, बावनकुळे ही आडनावेही तशीच म्हणायची का असा विनोद सोशल मीडियावर फिरत आहे.

बालभारतीचा नेमका वाद काय?

बालभारतीने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून गणिताच्या अभ्यासक्रमातील संख्या वाचनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार विद्यार्थ्यांना एकवीसऐवजी वीस एक, त्र्याहत्तरऐवजी सत्तर तीन, त्र्याण्णवऐवजी नव्वद तीन अशा नव्या पद्धतीने संख्यावाचन करावे लागणार आहे. नुकतंच बालभारतीद्वारे इयत्ता दुसरीचा अभ्यासक्रमात हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना गणित विषयाचा अभ्यास करणं सोपे जाईल अशी आशा बालभारतीला आहे.

संबंधित बातम्या 

बालभारतीचे भलते प्रयोग, ‘एकवीस’ऐवजी ‘वीस एक’   

बालभारती वाद : जे शिक्षण आमदाराच्या मुलाला, तेच गरिबाच्या पोराला हवं : बच्चू कडू 

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली