AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभेत मताधिक्य घटल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे आदेश, म्हणाले “आता विधानसभा निवडणुकीत…”

जागावाटप, युती गणित, उमेदवारांची निवड यांसह विविध विषयांवर पक्षांतर्गत चर्चा सुरु आहेत. त्यातच आता भाजपची एक महत्त्वाची बैठक पार पडली.

लोकसभेत मताधिक्य घटल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे आदेश, म्हणाले आता विधानसभा निवडणुकीत…
देवेंद्र फडणवीस
| Updated on: Jul 03, 2024 | 11:21 AM
Share

Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील सर्व पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. यंदाच्या विधानसभेत चांगली कामगिरी करता यावी, यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. जागावाटप, युती गणित, उमेदवारांची निवड यांसह विविध विषयांवर पक्षांतर्गत चर्चा सुरु आहेत. त्यातच आता भाजपची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत बेसावध राहू नका, असे आदेश दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूचना

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठ्या प्रमाणात फटका बसला. लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ 9 जागांवर समाधान मानावं लागलं. त्यानंतर आता भाजपने विधानसभेसाठी कंबर कसली आहे. देवेंद्र फडणवीसांनी नुकतंच भाजपची एससी आणि एसटी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी नेत्यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

देवेंद्र फडणवीसांची रात्री उशीरा बैठक

भाजपला लोकसभेत एससी आणि एसटी मतांचा मोठा फटका बसला होता. विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात नरेटिव्ह करण्यात आले, असा आरोप सातत्याने पाहायला मिळाला. त्याच पार्श्वभूमीवर काल एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. एससी आणि एसटी या भाजपच्या आघाड्यांसोबत देवेंद्र फडणवीसांनी रात्री उशीरा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी आगामी विधानसभेच्या तयारीला लागा, असे आदेश त्यांना दिले.

विधानसभेसाठी भाजपने कंबर कसली

विरोधकांचे नरेटिव्ह खोडून काढण्यात आपण अपयशी ठरलो. त्यामुळे विधानसभेत अशाप्रकारे जर नरेटिव्ह आले, तर आपण त्याला चोख प्रत्युत्तर दिलं पाहिजे, अशी सूचनाही या बैठकीत करण्यात आली. तसेच विधानसभा निवडणुकीत बेसावध राहू नका, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.