फोटो तुमचा, फोटोग्राफर तुमचा, पण फोटोफ्रेमचा एन्ड भाजप करेल : आशिष शेलार

| Updated on: Nov 25, 2019 | 9:47 PM

"फोटो तुमचा, फोटोग्राफर पण तुमचाच, पण या फोटोफ्रेमचा एन्ड भाजप करेल," असे टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी (ashish shelar criticism we are 162)  केली.

फोटो तुमचा, फोटोग्राफर तुमचा, पण फोटोफ्रेमचा एन्ड भाजप करेल : आशिष शेलार
Follow us on

मुंबई : “फोटो तुमचा, फोटोग्राफर पण तुमचाच, पण या फोटोफ्रेमचा एन्ड भाजप करेल,” असे टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी (ashish shelar criticism we are 162)  केली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज एकत्र फोटोसेशन आणि ओळख परेड (ashish shelar criticism we are 162) झाली. यावेळी महाविकासआघाडीच्या 162 आमदारांनी एकनिष्ठतेची शपथ घेतली. यावर आशिष शेलार टीका (ashish shelar criticism we are 162) केली.

“फोटो तुमचा, फोटाग्राफर तुमचा, पण या रेसची फोटोफिनिश आम्हीच करु. भाजपच करेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारच फोटोफिनिश करणार,” असे आशिष शेलार म्हणाले. “फोटो तुमचा, फोटोग्राफर पण तुमचाच, पण या फोटोफ्रेमचा एन्ड भाजप करेल,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

“नुकतंच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने यांचा एक पोरखेळ महाराष्ट्राने पाहिला. ओळख परेड ही आरोपीला गर्दी समूहातून साक्षीदाराने ओळखण्यासाठी केली असते. मात्र ता आपल्याच आमदारांना आपलेच नेते आरोपी मानत असतील. तर यापेक्षा लोकशाहीत जनादेशाचा अनादर कोणता असू शकतो.” असेही शेलार म्हणाले.

“शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने ओळख परेड करुन जनतेने निवडून दिलेल्या आमदारांचा अपमान केला आहे. त्याशिवाय निवडून देणाऱ्या जनतेचाही अपमान केला,” असेही ते म्हणाले.

“ओळख परेडमुळे विधानसभेत संख्याबळ सिद्ध होत नाही. अशा ओळख परेडने आत्मविश्वास गमवलेल्यांचे नेत्यांचे आत्मबळ वाढवण्याचा टुकार प्रयत्न असतो. त्यामुळे जे नेते आपण पाहिले त्यांचा आत्मबळ वाढवण्याचा ते प्रयत्न करत आहे,” अशी टीकाही शेलार यांनी केली.

“या ओळख परेडमध्ये 162 आमदार असल्याचा कांगावा केला. पण प्रत्यक्षात 145 आमदार तरी होते का याचं उत्तर त्यांनी द्याव,” असेही ते म्हणाले.

“शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाने म्हणजेच आदित्य ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाची शपथ घेतली. सत्ता येते सत्ता जाते. पण सत्तेच्या खुर्चीसाठी आपलं नेतृत्व बदलेले आज सर्व जनतेने पाहिले. त्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्व किती बेगडी आहे हे महाराष्ट्राने पाहिले.”असेही आशिष शेलार म्हणाले.