एकनाथ खडसेंचाही फोन टॅप झाल्याचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

| Updated on: Feb 05, 2020 | 10:03 PM

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचाही फोन टॅप केल्याचा आरोप होत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ (Eknath khadse Phone Tap) उडाली आहे.

एकनाथ खडसेंचाही फोन टॅप झाल्याचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
Follow us on

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचाही फोन टॅप केल्याचा आरोप होत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ (Eknath khadse Phone Tap) उडाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात विरोधकांप्रमाणे खडसेंचाही फोन टॅप करण्यात आला, अशी बातमी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे. या सर्व प्रकरणी उद्या (6 फेब्रुवारी) बोलेन, अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिली आहे.

महाराष्ट्रातील काही नेत्यांसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.

याप्रकरणी अनिल देशमुख यांनी एक चौकशी समिती नेमली आहे. या समितीत दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दोन अधिकाऱ्यांच्या समितीमध्ये श्रीकांत सिंग आणि अमितेश कुमार हे दोन अधिकारी आहेत. कोण कोण अधिकारी इस्त्रायलला गेले होते त्याचा तपास होईल. चौकशी समितीला सहा आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.

एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

फोन टॅपप्रकरणी एकनाथ खडसे यांना विचारले असता, त्यांनी “मी याबाबत उद्या बोलेन,” अशी प्रतिक्रिया दिली.

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते. मात्र त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकांपूर्वी आणि त्यानंतरही खडसेंनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली (Eknath khadse Phone Tap) होती.

दरम्यान, ऑक्टोबर 2019 मध्ये इस्त्राईलच्या एनएसओ ग्रुपच्या पिगासिस सॉफ्टवेअर वापरुन 1400 लोकांची हेरगिरी केल्याची माहिती  व्हॉट्सअॅपनं दिली होती. यात 121 भारतीयांचाही समावेश होता. त्यानंतर जगभरात याचे पडसाद उमटले. भारतातही राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप झाला होता.

ठाकरे सरकारनं सत्तास्थापनेनंतर फडणवीस सरकारच्या काळातील अनेक मोठ्या निर्णयांना पलटवलं आहे. तसेच फडणवीस सरकारवर झालेल्या अनेक आरोपांची नव्यानं चौकशी करण्यास सुरुवात केली. आता हेरगिरीप्रकरणाची चौकशीही सुरु होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक खुलासे होण्याची शक्यता (Eknath khadse Phone Tap) आहे.

संबंधित बातम्या :

भाजपने फोन टॅप केले, आता समिती चौकशी करेल, चौकशी अधिकाऱ्यांची नावं गृहमंत्र्यांकडून जाहीर