Kirit Somaiya | चपराक खाऊन उद्धव ठाकरेंचे गाल सूजले, भाजप नेते किरीट सोमय्यांची खोचक टीका

| Updated on: May 12, 2022 | 10:42 AM

उद्धव ठाकरे पोलीस प्रशासानाचा वापर माफियाप्रमाणे करत आहे. हा चिंतेचाच विषय आहे. माफियांना आम्ही ठिकाणावर आणणार. हद्द केली आहे. खासदार आणि आमदारांना धमकी गेतात. वीस फुट खड्ड्यात गाढण्याची भाषा फक्त माफिया सरकार करू शकते, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Kirit Somaiya | चपराक खाऊन उद्धव ठाकरेंचे गाल सूजले, भाजप नेते किरीट सोमय्यांची खोचक टीका
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्लीः कधी कनिष्ठ तर कधी वरिष्ठ, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय या सगळ्यांकडून सारख्या चपराक खाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे दोन्ही गाल सूजले आहेत. उद्धव ठाकरेंना दोनच गाल आहेत. ते तरी किती चपराक खाणार, अशी खोचक टीका भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली. किरीट सोमय्या यांनी आज खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची भेट घेतली. सुप्रीम कोर्टानं काल राजद्रोहाचं (Sedition) कलम तात्पुरतं स्थगित केलं. उद्धव ठाकरे सरकारने राणा दाम्पत्याविरोधात हेच कलम लावलं असल्यानं ठाकरे सरकारला यावरून कोर्टानं चपराक दिल्याचं बोललं जात आहे. यापूर्वीदेखील मुंबई सत्र न्यायालयाने राजद्रोहाचं कलम योग्य नसल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकार आणखी किती चपराक खाणार, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान, राणा दाम्पत्याने उद्ध ठाकरे यांना आव्हान देत नवी दिल्लीत 14 मे रोजी हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं घोषित केलं आहे.

‘उद्धव यांना दोनच गाल’

पोलीस कमीशन संजय पांडे यांचा वापर उद्ध ठाकरे सरकार माफियाप्रमाणे करत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. मात्र कोर्टानं सरकारला त्यांची जागा दाखवल्याचं सांगत किरीट सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे गाल दोनच. कधी कनिष्ठ, कधी सत्र न्यायालय. कधी उच्च न्यायालय तर कधी सुप्रीम कोर्ट…किती चपराक मारणार, त्यांचे गाल पाहिले.. किती सूजले आहेत. आता ते माफिया पोलीस कमीशनर कुठे आहेत? संजय पांडे साहेब, हिंमत असेल सुप्रीम कोर्टाला जाब विचारा. राजद्रोहाचं कलम सुप्रीम कोर्टानं निरस्त केलं. आता उद्धव ठाकरे सरकार काहीही करू शकत नाही, असं किरीट सोमय्या म्हणाले.

‘माफिया सरकारचा अंत करूनच स्वस्थ बसणार’

उद्धाव ठाकरे सरकारवर टीका करताना किरीट सोमय्या म्हणाले, ‘ उद्धव ठाकरे पोलीस प्रशासानाचा वापर माफियाप्रमाणे करत आहे. हा चिंतेचाच विषय आहे. माफियांना आम्ही ठिकाणावर आणणार. हद्द केली आहे. खासदार आणि आमदारांना धमकी गेतात. वीस फुट खड्ड्यात गाढण्याची भाषा फक्त माफिया सरकार करू शकते. मी स्वतः लोकसभा अध्यक्षांना भेटून या माफियागिरीबद्दल तक्रार करणार आहे. गृहसचिवांचीही भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारचा अंत झाल्यानंतरच आम्ही स्वस्थ बसणार आहोत, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.

हिंमत असेल तर हनुमान चालिसा बंद करावी’

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दिल्लीतील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा म्हणण्याचं आव्हान उद्धव ठाकरे सरकारला दिलं आहे. यावरून इशारा देताना किरीट सोमय्या म्हणाले, ‘ हिंदुस्थानचे करोडो लोक रामभक्त हनुमानाची पूजा करतात. आम्ही हनुमान भक्त जेव्हा रावण पैदा होतात, त्याच्या लंकेला जाळूनच टाकतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हनुमान चालिसा बंद करावी, असा इशारा किरीट सोमय्यांनी दिला आहे.