मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन झालेल्या तुफान राड्यानंतर भाजपच्या 12 आमदारांवर सरकारकडून 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यानंतर भाजपच्या निलंबित आमदारांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. सरकारने केलेल्या कारवाईचा आणि आरोपांचा अहवाल मागवा अशी मागणी या आमदारांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे केलीय. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर भाजप आमदारांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर आशिष शेलार, संजय कुटे यांनी सरकारवर तोफ डागलीय. (12 suspended BJP MLAs met Governor Bhagat Singh Koshyari)