AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अविश्वासाने स्थापन झालेल्या सरकारसाठी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना त्याग करायला सांगतात; चंद्रकांत पाटलांचा टोला

पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरकरांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी भाजपावर टीका केली. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटलांनी देखील उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

अविश्वासाने स्थापन झालेल्या सरकारसाठी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना त्याग करायला सांगतात; चंद्रकांत पाटलांचा टोला
चंद्रकांत पाटील Image Credit source: twitter
| Updated on: Apr 10, 2022 | 6:37 PM
Share

मुंबई : पोटनिवडणुकीच्या (By-election) पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोल्हापूरकरांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, आम्ही जनतेच्या हितासाठी एकत्र आलो आहोत आणि राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. निवडून आल्यानंतर गुण्यागोविंदाने काम करा असे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले होते. आता या वक्तव्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. अविश्वासाने जे सरकार आले ते टिकण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना त्याग करण्याचे आवाहन करत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. एक जाग जिंकल्यामुळे महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार नाही, परंतु हिंदुत्त्व न मानणाऱ्या काँग्रेसच्या हातात  कोल्हापूरचे सीट जाऊ नये यासाठी भाजपाचा आटापिटा असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले पाटील?

चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अविश्वासाने जे सरकार आले ते टिकण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना त्याग करण्याचे आवाहन करत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले  की, एक जागा जिंकल्याने फार मोठा फरक पडणार नाही, मात्र हिंदुत्त्व न माणणाऱ्या काँग्रेसला ती जागा जाता कामा नये यासाठी आमचा आटापिटा असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. बंटी पाटील हे नक्कीच तुमचा तंबू  उखडून फेकतील असे देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

शिवसेनेने ठरवावे कोणासोबत जायचे?

भाजप म्हणजे हिंदुत्त्व नव्हे, आम्ही भाजप सोडली म्हणजे हिंदुत्त्व सोडले असे होत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याला देखील चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इथलं हिंदुत्त्व पुसलं जाणार नाही. शिवसेनेने ठरवावे त्यांना काँग्रेससोबत जायचे आहे की, भाजपाच्या भगव्यासोबत असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Arvind Sawant : तुमच्या इफ्तारच्या टोप्या पाहिल्या, 52 कॅरेटवाल्यांना हिंदूत्व शिकवू नका, अरविंद सावंतांचा भाजवर हल्लाबोल

जनतेच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो, राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी – उद्धव ठाकरे

ठाण्यात भाजप-शिवसेनेला खिंडार; मयुर शिंदेंसह शेकडो शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.