AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जनतेच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो, राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी – उद्धव ठाकरे

कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी (CM) कोल्हापूरकरांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्याचे म्हटले आहे.

जनतेच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो, राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी - उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे
| Updated on: Apr 10, 2022 | 5:36 PM
Share

कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी (CM) कोल्हापूरकरांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi government) प्रयोग यशस्वी झाला आहे. मात्र आता तुम्ही निवडणूक आल्यावर गुण्यागोविंदाने काम करा असे आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, कोल्हापूरमध्ये शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार का? तर त्याचे उत्तर होय असेच असेल. काँग्रेसला मतदान करणे पाप असेल तर भाजपाने मेहबुबा मुफ्तीसोबत युती केलीचना? शिवसेनेने भाजपाची साथ सोडली म्हणजे हिंदुत्त्व सोडले असे होत नाही, कारण भाजप म्हणजे हिंदुंत्त्व नव्हे असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून भाजपाला टोला

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे, भाजप म्हणजे हिंदुत्त्व नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपवाले म्हणतात की आम्हाला बाळासाहेबांचा आदर आहे. मग मी त्यांना प्रश्न करतो की त्यांनी समृद्धी महामार्गाला बाळासाहेंबांचे नाव देण्यासाठी विरोध का केला. त्यांना जर खरचच बाळासाहेबांबद्दल आदर असता तर आमचे युती संदर्भात जे काही बोलणे झाले होते, त्यावरून त्यांनी शद्ब फिरवला नसता. कारण ही सर्व बोलणी बाळासाहेबांच्या खोलीमध्ये झाली होती, त्या खोलीला आम्ही मंदिर मानतो असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

महागाईवरून केंद्रावर निशाणा

देशात महागाई वाढत आहे, पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. देशात वाढत असलेल्या महागाईवरून देखील मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार आणि मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींनी राशन तर मोफत दिले, मात्र ते कच्चे खायचे का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. भाजपाने विक्रांतच्या पैशातून राशन भरल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. राज्याच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आघाडी केली, हा महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात यशस्वी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

ठाण्यात भाजप-शिवसेनेला खिंडार; मयुर शिंदेंसह शेकडो शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

CM Uddhav Thackeray : ‘जाऊ दे! जीभ अडकायची माझी’ चंद्रकांत पाटलांवर टीका करताना असं का म्हणाले ठाकरे?

बाळासाहेबांचा आदर आहे म्हणता तर शहांनी दिलेला शद्ब का पाळला नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...