AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बाबरी मशीद पाडण्यासाठी शिवसैनिकांच्या तुकड्या गेल्या नाहीत’, पुन्हा राजकीय घमासान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच अयोध्या दौऱ्यावरुन आलेत. पण आता चंद्रकांत पाटलांनी बाबरी मशिदी संदर्भात शिवसेनेवर सवाल केलेत. बाबरी मशीद पाडली त्यावेळी शिवसैनिक नव्हते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार हल्लाबोल केला.

'बाबरी मशीद पाडण्यासाठी शिवसैनिकांच्या तुकड्या गेल्या नाहीत', पुन्हा राजकीय घमासान
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Apr 11, 2023 | 11:34 PM
Share

मुंबई : “बाबरी मशीद पाडण्यासाठी शिवसैनिकांच्या तुकड्या गेल्या नाहीत”, असं भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील बोलले आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत पाटलांसह भाजपवर तुटून पडले. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आता बाबरीच्या खंदकातून अनेक उंदीर बाहेर पडत असल्याचं म्हटलं. कोणी पक्ष म्हणून नाही तर, विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हिंदूंनी मशीद पाडल्याचं चंद्रकांत पाटलांचं म्हणणंय. पण बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्यासाठी भाजपचा डाव असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. 6 डिसेंबर 1992 ला अयोध्येतली बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून जवळपास 28 वर्षांनी अंतिम निकाल लागला आणि जमीन राम मंदिरासाठी हिंदू पक्षकारांना देण्यात आली. पण आता चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर, उद्धव ठाकरे संतापलेत.

भाजपच्या सुंदरलाल भंडारींचा किस्सा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही आपल्या जाहीर सभेतूनही सांगितलाय. तर उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांचा समाचार तर घेतलाच. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही घेरलंय. एक तर चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या नाही तर शिंदेंनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलीय. तर चंद्रकांत पाटील बाळासाहेबांबद्दल नाही तर उद्धव ठाकरेंबद्दल बोलल्याचं सांगत, मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय.

फडणवीस आणि उद्धव ठाकरेही याआधी आमनेसामने

बाबरी मशीद आणि शिवसेनेवरुन चंद्रकांत पाटीलच बोलले असं नाही. तर काही महिन्याआधी याच विषयावरुन फडणवीस आणि उद्धव ठाकरेही आमनेसामने आले होते. आपण स्वत: बाबरी पाडण्यासाठी गेलो होतो, तेव्हा शिवसेना कुठं होती ? असा जाहीर सवाल फडणवीसांनीही केलाय.

आरोपींमध्ये शिवसेनेचे ठाण्याचे सतीश प्रधान यांचाही समावेश

बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणात एकूण 32 आरोपी होते. 2020मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर त्यांची आरोपातून निर्दोष मुक्तताही झाली. पण त्याचवेळी सुप्रीम कोर्टात प्रकरण असताना 17 आरोपींचं निधन झालं, ज्यात बाळासाहेब ठाकरेंचंही नाव होतं. त्यामुळं लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारतींसह 32 हयात असलेल्यांवरच खटला चालला. विशेष म्हणजे या 32 आरोपींमध्ये शिवसेनेचे ठाण्याचे सतीश प्रधान यांचाही समावेश होता.

खासदार संजय राऊत यांचीदेखील टीका

दुसरीकडे बाबरी प्रकरणावरुन बाळासाहेबांबत चंद्रकांत पाटलांच्या तोंडून भाजपच बोलत असल्याचं खासदार संजय राऊत म्हणालेत. बाळासाहेबांचा अवमान केलेला नाही, असं चंद्रकांत पाटील वारंवार सांगतायत. पण बाबरीवरुन चंद्रकांत दादा जे बोलले त्यावरुन ठाकरे गट विशेषत: उद्धव ठाकरेंनीही घेरण्याची संधी सोडलेली नाही.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार