‘बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई अभी बाकी है’, चंद्रकांत पाटलांचं शिवसेनेला थेट आव्हान

| Updated on: Sep 06, 2021 | 5:54 PM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. 'ज्या ज्या वेळेला रिझल्ट चांगले असतात, त्यावेळेला ईव्हीएम चांगलं असतं आणि ज्या वेळी निकाल त्यांच्या विरोधात लागतात तेव्हा ईव्हीएममध्ये त्यांना घोटाळा वाटतो. हे त्यांच्या आणि विरोधकांच्या स्वभावानुसारच आहे', असा टोला पाटील यांनी लगावलाय.

बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई अभी बाकी है, चंद्रकांत पाटलांचं शिवसेनेला थेट आव्हान
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us on

पुणे : बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपनं एकहाती वर्चस्व मिळवल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. एकीकरण समिती मराठी माणसांची प्रातिनिधीक संघटना आहे. या संघटनेचा पराभव झाला म्हणून काही लोक महाराष्ट्रात पेढे वाटत आहेत. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता. लाज वाटत नाही, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला. त्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘ज्या ज्या वेळेला रिझल्ट चांगले असतात, त्यावेळेला ईव्हीएम चांगलं असतं आणि ज्या वेळी निकाल त्यांच्या विरोधात लागतात तेव्हा ईव्हीएममध्ये त्यांना घोटाळा वाटतो. हे त्यांच्या आणि विरोधकांच्या स्वभावानुसारच आहे’, असा टोला पाटील यांनी लगावलाय. (Chandrakant Patil warns ShivSena about  BMC Election after Belgaum municipal elections)

सोशल मीडियावर भाजपकडून ट्रेंड केलं जात आहे की बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है, याबाबत पाटील यांना विचारलं असता, ‘बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे’ हे तर नक्कीच आहे आणि ती सोडणार नाहीत. हैदराबादच्या वेळेलाही आम्ही म्हटलं होतं. दोन का एक नगरसेवकावरुन थेट आम्ही 51 वर गेलो. तेव्हा आम्ही म्हणलं की ज्या स्टाईलने आम्ही हैदराबाद लढलो, त्याच स्टाईलने मुंबई लढणार, असं थेट आव्हानच पाटील यांनी शिवसेनेला दिलं आहे. तसंच बेळगावात भाजपचे जे नगरसेवक निवडून आले आहेत, त्यात निम्म्यापेक्षा जास्त मराठी भाषिकच असल्याचं पाटील यांनी आवर्जुन सांगितलं.

‘बहुतेक राऊतांना अल्झायमर सुरु झालाय’

कोथळा बाहेर काढण्याच्या संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुनही पाटील यांनी राऊतांना टोला लगावला. ‘खोटं बोल पण रेटून बोल.. सकाळी एक बोलायचं दुपारी एक. त्यांना बहुतेक अल्झायमर सुरु झाल्याचं दिसतंय. त्यामुळे दुपारी लक्षातच राहत नाही काय बोललो. ते क्लिअर कट अस म्हणाले की आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही तर कोथळाच काढतो. ते पोलीस बघतली. पण पोलीस त्यांच्या दबावाखाली काम करत असल्यामुळे ते काय करतील माहिती नाही. पण आमच्या पुण्याच्या अध्यक्षांनी तर तक्रार दाखल केली आहे’, असं पाटील यावेळी म्हणाले.

‘मराठी भाषिक भाग महाराष्ट्राला मिळायला हवा’

बेळगाव सीमा वादाबाबत पत्रकारांनी विचारलं असता, वर्षानुवर्षे आमचा मुद्दा हा आहे की दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसणं वाढवलं पाहिजे. हा सगळा न्यायालयीन विषय आहे तो कधी सुटेल तेव्हा सुटेल. तोपर्यंत तिथल्या मराठी भाषिकांना सन्मानाचं जीवन जगता आलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाची एकच भूमिका आहे की, हा सगळा मराठी भाषिक भाग आहे आणि तो महाराष्ट्राला मिळाला पाहिजे.

इतर बातम्या :

मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही, बेळगावच्या भाजपच्या विजयावर राऊतांचा संताप

बेळगावमध्ये कमळ कसे फुलले?, एकीकरण समितीच्या पराभवाची कारण काय?; वाचा, दहा पॉईंटमधून!

Chandrakant Patil warns ShivSena about BMC Election after Belgaum municipal elections