AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4.25 लाखांचा बंगला, लाकडे विकून केली 11.5 लाखांची कमाई, आज यांच्या पालीमधील बंगल्याची किंमत किती?

जितेंद्र यांनी 4.25 लाख रुपयांमध्ये खरेदी केलेला भारत भूषण यांचा बंगला. बंगला पाडल्यानंतर फक्त त्यामधील लाकडे विकूनच केलेली 11.5 लाख रुपयांची कमाई. आज त्या बंगल्याची किंमत ऐकून बसेल धक्का.

4.25 लाखांचा बंगला, लाकडे विकून केली 11.5 लाखांची कमाई, आज यांच्या पालीमधील बंगल्याची किंमत किती?
Image Credit source: Social media
| Updated on: Jul 23, 2026 | 2:27 PM
Share

80 च्या दशकातील दिग्गज अभिनेते जितेंद्र हे केवळ आपल्या गाजलेल्या चित्रपटांसाठीच नाही तर रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठीही ओळखले जातात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी मुंबईतील प्रतिष्ठित पाली हिल परिसरातील बंगला खरेदी करण्यामागची रंजक कहाणी सांगितली आहे. हा बंगला त्यांनी त्या काळातील प्रसिद्ध अभिनेते भारत भूषण यांच्याकडून केवळ 4.25 लाख रुपयांना विकत घेतला होता. आज त्याच जागेची किंमत सुमारे 450 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते.

‘द रिअल्टी ड्राइव्ह’ला दिलेल्या मुलाखतीत जितेंद्र यांनी सांगितले की, ‘बैजू बावरा’सारखा सुपरहिट चित्रपट देणारे अभिनेते भारत भूषण एका काळात गंभीर आर्थिक संकटातून जात होते. आर्थिक अडचणींमुळे त्यांना पाली हिलमधील आपला आलिशान बंगला केवळ 4.25 लाख रुपयांना विकण्याची वेळ आली होती. त्या काळाच्या आठवणी सांगताना जितेंद्र म्हणाले, ‘भारत भूषण हे त्या काळातील मोठे स्टार होते. ते स्वतः माझ्याकडे त्यांचा पाली हिलमधील बंगला विकण्याचा प्रस्ताव घेऊन आले. मी ही गोष्ट वडिलांना सांगितली. ते म्हणाले, ‘चला, आपणही एक बंगला घेऊया.’

ते पुढे म्हणाले, ‘त्याआधी आमचे कुटुंब अत्यंत साधे आणि मध्यमवर्गीय परिस्थितीत राहत होते. आम्ही आठ जण एका चाळीतील अवघ्या 20 बाय 10 फुटांच्या खोलीत राहत होतो. अखेर मी तो बंगला 4.25 लाख रुपयांना विकत घेतला. विशेष म्हणजे या व्यवहारात 3450 चौरस फुटांचा प्लॉटही समाविष्ट होता.’

नवं घर अन् पहिले चार चित्रपट ठरले फ्लॉप

जितेंद्र यांनी सांगितले की, बंगला खरेदी करून ते तेथे राहायला गेल्यानंतर त्यांच्या सलग चार चित्रपटांना अपयश आले. त्यामुळे त्यांना भीती वाटू लागली की, आपलेही भविष्य भारत भूषण यांच्यासारखे होईल की काय. या भीतीमुळे त्यांनी तो बंगला सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुढील काळात हीच मालमत्ता त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक फायदेशीर गुंतवणुकींपैकी एक ठरली.

केवळ लाकडातूनच मिळाले तिप्पट पैसे

काही वर्षांनी एका डेव्हलपरने त्या जागेच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव दिला. जितेंद्र यांनी तो स्वीकारला. बंगला पाडताना त्यामध्ये वापरण्यात आलेल्या उच्च दर्जाच्या सागवान लाकडाची विक्री करण्यात आली.

याबाबत जितेंद्र म्हणाले, ‘तुमचा विश्वास बसणार नाही, पण बंगला पाडल्यानंतर त्यातील लाकडासाठी मला 11.5 लाख रुपये मिळाले. मी संपूर्ण बंगला 4.25 लाख रुपयांना विकत घेतला होता आणि केवळ त्यातील लाकूड विकूनच मूळ खरेदी किमतीच्या जवळपास तीनपट रक्कम मिळाली.’

Follow Us
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
Priyanka Gandhi | पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार! सरकारला दिलं थेट आव्हान
प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची भूमिका काय?
Dharmendra Pradhan News |  धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत केंद्र सराकर नेमकी काय भूमिका घेणार?