AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, औरंगाबाद पोलिसात तक्रार दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद दौऱ्यावरून वाद निर्माण झाला आहे.

Aurangabad | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, औरंगाबाद पोलिसात तक्रार दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा औरंगाबाद दौरा वादातImage Credit source: twitter
| Updated on: Aug 02, 2022 | 10:34 AM
Share

औरंगाबादः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांचा औरंगाबाद दौरा वादात सापडला आहे. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी औरंगाबाद पोलिसात तक्रार दाखल झाली आहे . औरंगाबाद दौऱ्यात मुख्यमंत्री महोदयांनी रात्री 10 नंतर लाऊड स्पीकरवर (Loudspeaker) भाषण केल्याने केली गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. शनिवार आणि रविवारी मुख्यमंत्री औरंगाबादेत (Aurangabad) होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी रात्रीच्या वेळी कार्यक्रम घेतले आणि यावेळी लाऊडस्पीकर वापरण्यात आला, जो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. आनंद कस्तुरे यांनी औरंगाबाद येथील क्रांती चौक पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध कृती केल्याचे पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. औरंगाबाद शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत कार्यक्रम सुरु होते. त्यामुळे याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारीत नेमकं काय म्हटलंय?

चिकलठाणा येथील रहिवासी अर्जदार आनंद कस्तुरे यांनी ही तक्रार दिली आहे. ते आंबेडकरी चळवळीत सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतात. ३१ जुलै रोजी क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ स्टेजवर रात्री १० ते अकरा वाजेच्या दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ सिंदे यांनी लाऊड स्पीकरद्वारे भाषण करून सर्वोच्च न्यायालयायाच्या आदेशाचं उल्लंघन केलं आहे, तसेच त्या ठिकाणी बेकायदेशीर जमावसुद्धा उपस्थित होता, असं तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आजच्या पुणे दौऱ्यात काय वाद?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी हडपसर येथील उद्यानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव देण्याचं नियोजन होतं. मात्र काही स्वयंसेवी संघटनांनी याला आक्षेप घेतला होता. हडपसर येथील उद्यानाची जागा महापालिकेची आहे. मात्र उद्यानाचा विकास आपण केल्याचा दावा नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी केला आहे. त्याप्रमाणे परिसरातील रहिवासी आणि महापालिका आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उद्यानाला शिंदे यांचं नाव देण्यास सहमती दर्शवण्यात आली होती, असाही त्यांचा दावा आहे. मात्र महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. महापालिकेच्या प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ प्रशासनाच्या माध्यमातून आयोजित होणे अपेक्षित आहे. तरीही नगरसेवकांनी स्वतःच या कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे काही स्वयंसेवी संघटनांनी यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.