AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युती केली ही एकच गोष्ट चुकली, नाही तर विधानसभा निवडणुकीत 150 च्या पुढे गेलो असतो : देवेंद्र फडणवीस

विधानसभा निवडणुकीत युती केली ही एकच गोष्ट चुकली, भाजपला 150 पेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय (Devendra Fadnavis claim on Maharashtra Assembly Election).

युती केली ही एकच गोष्ट चुकली, नाही तर विधानसभा निवडणुकीत 150 च्या पुढे गेलो असतो : देवेंद्र फडणवीस
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Sep 18, 2020 | 6:41 PM
Share

मुंबई : विधानसभा निवडणुकीत युती केली ही एकच गोष्ट चुकली, भाजपला 150 पेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय (Devendra Fadnavis claim on Maharashtra Assembly Election). ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहाच्या व्हर्च्युअल रॅलीत बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या राजकीय भाकितांचा आधार घेत हे वक्तव्यं केलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाऊ तोरसेकर यांनी 2013 मध्येच सांगितले होते की भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी निवडलं तर संपूर्ण बहुमत 272+ जागा भाजपला मिळतील. त्यावेळी अनेकांना हे जरा जास्त सांगत आहेत असं वाटलं, पण ते सत्य झालं. 2019 मध्ये देखील देशात अस्थिरतेचं वातावरण होतं. बिहार आणि दिल्लीसारखी एखादी निवडणूक हरलो होतो. अशावेळी अनेकांना वाटत होतं नकारात्मक वातावरण आहे. अनेक पक्ष एकत्र झाले होते. त्यावेळी देखील भाऊ तोरसेकर यांनी भाजपला 300 पेक्षा अधिक जागा मिळतील असं सांगितलं होतं. ते देखील सत्य झालेलं आपण बघितलं.”

“खरं म्हणजे एकच गोष्ट आपली चुकली. भाऊ तोरसेकर यांनी विधानसभेच्या आधी एक पुस्तक लिहिलं होतं. त्यात त्यांनी भाजपला पर्याय दिले होते. भाजप 150+ किंवा युती 200+. त्यावेळी आपण युतीचा पर्याय निवडला. तो पर्याय स्वीकारला नसता तर भाऊ तोरसेकर यांचं तिसरं भाकित देखील खरं ठरलं असतं,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

“मोदींनी राष्ट्रवादाला खऱ्या अर्थाने कर्तृत्वाची जोड दिली”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मोदींनी सामान्य लोकांसाठी काम करुन भारताचा जीडीपी सर्वात जास्त होईल असं काम केलं. पंतप्रधान आवास योजना, शौचालय आणि सर्वसामान्य जनतेच्या उपयुक्त योजनांना त्यांनी प्राधान्य दिलं. देशाच्या आर्थिक उत्पन्नापेक्षा सर्वसामान्यांना रोजगार कसा मिळेल याकडे मोदींनी लक्ष दिलं. कोरोनाच्या काळात देखील केवळ मोदींमुळे विदेशी गुंतवणूक झाली. मोदींनी शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करणारा निर्णय घेतला. शेतकऱ्याला हमीभाव असेल यासाठी त्यांनी काम केलं. ते स्वामिनाथन आयोगाच्या अहवालावर काम करणारे नेते आहेत.”

संबंधित व्हिडीओ :

Devendra Fadnavis claim on Maharashtra Assembly Election

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...