AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : ठाकरे सरकारच्या कारकिर्दीची चिरफाड ते एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा, वाचा सविस्तर…

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातील 5 मोठे मुद्दे

Devendra Fadnavis : ठाकरे सरकारच्या कारकिर्दीची चिरफाड ते एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा, वाचा सविस्तर...
| Updated on: Jun 30, 2022 | 5:16 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील 10 दिवसांचं सत्तानाट्य आज अखेर एका नव्या वळणावर येत वेगळा अंक सुरू करतंय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील. याची घोषणा खुद्द देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलीय. अवघा देश डोळे लावून बसलेल्या पत्रकार परिषदेत सगळ्यात मोठा मास्टरस्ट्रोक देवेंद्र फडणवीस यांनी टाकला ज्यामुळे सगळ्यांचं भूवया उंचावल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अन् तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असाच सगळ्यांचा अंदाज होता. पण तो साफ खोटा ठरवत त्यांनी शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची पुढे केली अन् सरकारला आपला बाहेरून पाठिंबा असेल असं फडणवीसांनी जाहीर केलं. आणखी कोणत्या मुद्द्यांवर फडणवीस बोलले? पाहुयात…

1. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलीय. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असतील आणि आज संध्याकाळी त्यांचा एकट्याचाच शपथविधी होईल अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आज राजभवनावर जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर फडणवीस आणि शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील सरकार चालेल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. तसंत शिंदे यांचा आज संध्याकाळीच शपथविधी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

2. आमचा बाहेरून पाठिंबा

शिंदे सरकारला भाजपचा बाहेरून पाठिंबा असेल, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. “मी बाहेर असेल. पण सरकार चालेलही माझी जबाबदारी असेल. या सरकारला मी साथ आणि समर्थन देणार. पुन्हा एकदा हिंदुत्ववादी विचाराचं आणि बाळसााहेबांनी मांडलेलं हिंदुत्व. भाजप हिंदुत्व मांडतय. मोदींनी जे व्हिजन दाखवलं ते पुढे नेणार. शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा विधीमंडळ गट, भाजप आणि 16 अपक्ष आमदार एकत्रं आले आहेत. अजून काही लोक येत आहेत. या सर्वांचं पत्रं आम्हाी राज्यपालांना दिलं. आण्ही सत्तेच्या पाठिमाग नाही. मुखय्मंत्रीपदासाठी आण्ही चालत नाही.ही तत्तवाची लढाई. हिंदुत्वाची लढाई आहे. विचाराची लढाई. आम्ही शिंदेंना भाजप पाठिंबा देईल आणि शिंदे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे आज साडे सात वाजता शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. एकट्याचाच शपथ विधी होईल. नंतर आम्ही विस्तार करू. त्यात शिवसेनेचे शिंदेंसोबत असलेलेल भाजपचे सर्व लोक या मंत्रिमंडळात येतील”, असं फडणवीस म्हणालेत.

3. मविआच्या कामांची चिरफाड

“आघाडीने विकासाची कामे केली नाही. भ्रष्टाचार केला. राज्याच्या इतिहासात दोन मंत्री भ्रष्टाचारात जेलमध्ये जाणं ही आश्चर्याची आणि खेदजनक बाब होती. एकीकडे बाळासाहेबांनी देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला. दुसरीकडे त्याच्याशी संबंधित मंत्री तुरुंगात जातो त्याला मंत्रीपदावरून काढलं नाही. रोज सावरकर हिंदुत्वाचा अपमान. ठिक आहे. शेवटच्या दिवशी संभाजी नगर झालं. पण कधी. राज्यपालांचं पत्रं आल्यावर कॅबिनेट घ्यायची नसते. तरीही कॅबिनेट घेऊन संभाजीनगर धाराशीव दिबा पाटील हे निर्णय घेतले. अर्थात हे निर्मय आमच्या सरकारला पुन्हा घ्यावे लागणार आहे. कारण ते वैध मानले जाणार नाही. पण ते आम्ही घेऊ”, असं म्हणत देवेंद्र यांनी मविआ सरकारच्या कामाचा आढावा घेतला.

4. 2019 च्या निवडणुकीचा

“आपल्या सर्वांना कल्पना आहे. २०१९च्या निवडणुकीत भाजप आणि सेनेची युती होती. या युतीच्या माध्यमातून भाजप १०५ जागा जिंकली. शिवसेना ५६ जागा जिंकली. अशा १६१ जागा आणि अपक्ष मिळून १७० लोकं निवडून आले होते. सहाजिकच अपेक्षा होती की भाजप सेनेच्या युतीचं सरकार येईल. त्यावेळी मोदींनी सर्वांच्या उपस्थित भाजपचा मुखय्मंत्री बनेल अशी घोषणा केली होती. पण दुर्रेवाने निवडमुकीचे निकाल आल्यानंतर तेव्हाचे आमचे मित्रं शिवसेना नेत्याने यांनी वेगळा निर्णय घेतला. बाळासाहेब ठाकरे यांनी आजन्म ज्यांचा विरोध केला आणि ज्यांनी हिंदुत्वाचा विरोध केला. सावरकरांचा विरोध केला अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली. अन् भाजपला बाहेर ठेलं हा मॅनडेटचा अपमान होता. लोकांनी महाविकास आघाडीला मतदान केलं नवह्तं. ते युतीला होतं. पण जनतेच्या कौलाचा अपमान केला”, असं म्हणत फडणवीसांनी त्यांच्या मनातील सल बोलून दाखवली.

5. शिवसेनेची कुंचंबना

“शिवसेनेच्या आमदारांची कुचंबना झाली. शिंदे हे शिवसेनेचे नेते. आमच्या मतदारसंघात हारलेल्या विरोधकांना निधी दिला जात असेल तर कशाच्या भरवश्यावर लढायचं असा विषय झाल्यानंतर या सर्वांनी निर्णय घेतला. की युती तोडायची. ज्या युती सोबत निवडून आलो. ती आघाडी तोडा. त्यासोबत राहायला तयार नाही, दुर्देवाने उद्धवजींनी या आमदारांच्या ऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना अधिक प्राधान्य दिले. त्यांचीच शेवटपर्यंत कास धरली. हा त्यांचा प्रश्न. त्यावर बोलणार नाही. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज आहे. सरकार पडलं तर आम्ही पर्यायी सराकर देऊ लोकांच्या डोक्यावर निवडणुका लादणार नाही. असं मी वारंवार सांगत होतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

Follow Us
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.