AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसला मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय भाजपच्या वाटेवर

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचे अत्यंत निकटवर्ती आणि काँग्रेसचे (Congress) विधानपरिषद आमदार आनंदराव पाटील (Anandrao Patil) भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.

काँग्रेसला मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय भाजपच्या वाटेवर
| Updated on: Sep 10, 2019 | 8:38 AM
Share

मुंबई: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचे अत्यंत निकटवर्ती आणि काँग्रेसचे (Congress) विधानपरिषद आमदार आनंदराव पाटील (Anandrao Patil) भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. त्यामुळे आनंदराव पाटील भाजपमध्ये जाणार का? याबद्दल अनेकांना उत्सुकता लागली आहे. पाटील यांनी भाजपचा रस्ता धरल्यास पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला हा आणखी एक मोठा धक्का असणार आहे.

आनंदराव पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर विरोधक अतुल भोसले (Atul Bhosale) यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट घेतली. त्यानंतर पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेंना उधाण आले आहे. आनंदराव पाटील माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. आनंदराव पाटील 13 सप्टेंबर रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही सांगितलं जात आहे. ते आपल्या आमदार पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे.

कराड विधानसभा मतदारसंघात त्यांचा चांगला प्रभाव आहे. त्यामुळे आनंदराव पाटील भाजपमध्ये गेल्यास पृथ्वीराज चव्हाण यांच्या अडचणीत देखील वाढ होणार आहे. कराड विधानसभा मतदारसंघात आनंदराव पाटील यांची ताकद भाजपला मिळाल्यास चव्हाण यांची आगामी विधानसभा निवडणुकीत मोठी राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोरील इतर आव्हाने

पृथ्वीराज चव्हाण यांना कराडमधून भाजपने देखील मोठे आव्हान उभे केले आहे. भाजपने चव्हाण यांच्याविरोधात अतुल भोसलेंना उभं केलं आहे. अतुल भोसले यांनी 2014 मध्ये भाजपकडून कराड दक्षिण मतदारसंघातून, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, विलासकाका पाटील उंडाळकर आणि अतुल भोसले अशी तिहेरी लढत होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी विजय मिळवला, मात्र विलासकाका आणि अतुल भोसले यांनी त्यांची चांगलीच दमछाक केली होती.

पृथ्वीराज चव्हाणांना त्यावेळी 76 हजार 831 मतं मिळाली होती, तर विलासकाकांना 60 हजार 413 मतं आणि अतुल भोसले यांनी तब्बल 58 हजार 621 मतं मिळवली होती.

कोण आहेत भाजपचे उमेदवार अतुल भोसले?

डॉ. अतुल भोसले हे कराडचे युवा नेते म्हणून ओळखले जातात. अतुल भोसले हे सध्या भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांचे आजोबा जयवंतराव भोसले हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक होते. अतुल यांचे वडील डॉ. सुरेश भोसले हे कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष तर स्वत: अतुल भोसले हे कऱ्हाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजचे संचालक आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.