AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅबिनेटची नोट तयार होती, पण फक्त काँग्रेसला श्रेय मिळेल म्हणून निर्णय घेतला नाही : मनसे

लॉकडाऊनमधील वीज बिलं कमी करण्याबाबत कॅबिनेटची नोट तयार झाली होती, पण याचं काँग्रेसला श्रेय मिळेल म्हणून हा निर्णय घेण्यात आला नाही, असाही दावा मनसेने केलाय.

कॅबिनेटची नोट तयार होती, पण फक्त काँग्रेसला श्रेय मिळेल म्हणून निर्णय घेतला नाही : मनसे
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 19, 2020 | 3:55 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीजबिलं आली. यानंतर राज्य सरकारकडून जनतेचा असंतोष कमी करण्यासाठी वीजबिलं कमी करण्याचं आश्वासनही देण्यात आलं. मात्र, आता राज्य सरकारने वीज बिलं कमी होणार नसल्याची भूमिका घेतील. यानंतर राज्यातील राजकारणाचा पारा चढला आहे. यात मनसेने आक्रमक भूमिका घेत सरकारला अल्टिमेटच दिलाय. लॉकडाऊनमधील वीज बिलं कमी करण्याबाबत कॅबिनेटची नोट तयार झाली होती, पण याचं काँग्रेसला श्रेय मिळेल म्हणून हा निर्णय घेण्यात आला नाही, असाही दावा मनसेने केलाय. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज (19 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत मनसेची भूमिका स्पष्ट केली (Electricity Bill issue is pending due to Credit War of Congress and Thackeray Government claim MNS).

वीजबिलात माफी देण्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारने राज्यातील साडेअकरा कोटी जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे जनतेत संतापाची भावना आहे. सोमवारपर्यंत बील माफ करा, अन्यथा राज्यात जिल्ह्या-जिल्ह्यात जनांदोलन करण्यात येईल, असा इशारा बाळा नांदगावकर यांनी दिला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडल्यानंतर नांदगावकरांनी मनसेचे भूमिका जाहीर केली. या बैठकीत वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बाळा नांदगावकर म्हणाले, “राज्यातील जनतेला वाढीव वीजबिल आले. सरकारने हे बील कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं. आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून ते शरद पवारांपर्यंत सर्वांना निवेदनं दिली. पण वीजबिल माफ झाली नाही. उलट ऊर्जामंत्र्यांनी शब्द फिरवून महाराष्ट्राचा घोर अपमान केला. त्यामुळे राज्यातील जनतेची फसवणूक झाली असून जनतेत संतापाची भावना आहे. त्यामुळे आम्ही सरकारला येत्या सोमवारपर्यंत वीजबिल माफ करण्याचा अल्टिमेटम देत आहोत.”

“जर वीजबिल माफ नाही केलं, तर सोमवारनंतर जिल्ह्याजिल्ह्यात उग्र आंदोलनं होतील. लोकांचा संयम सुटला आहे. यानंतर जे होईल त्याला जबाबदार सरकारच असेल. तसेच कुणाची वीज कापल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही,” असा इशाराही दिला.

आंदोलनात कोणीही येऊ शकतो

भाजपनेही मनसेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता नांदगावकर यांनी हा प्रश्न सर्वांचाच आहे. त्यामुळे या आंदोलनात कुणीही येऊ शकतो. भाजपच काय काँग्रेस आणि राष्ट्रवादीही या आंदोलनात सहभागी होऊ शकते. त्यांनाही वाढीव वीजबिल आलंच आहे, असं ते म्हणाले. तसेच भाजप-मनसे युतीबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला. हा विषय माझ्या अख्त्यारीत येत नाही, असं सांगून या प्रश्नावर बोलणं त्यांनी टाळलं.

पवारांच्या शब्दाला किंमत उरली नाही

मनसेचं शिष्टमंडळ ऊर्जामंत्र्यांना भेटले, त्याशिवाय ऊर्जा सचिव, बीएमसी अधिकाऱ्यांना भेटले. अदाणी ग्रुपचे अधिकारी राज ठाकरेंना भेटले. राज ठाकरे स्वत: राज्यपालांना भेटले. राज्यपालांनी त्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना भेटण्यास सांगितलं. त्यानंतर राज ठाकरे हे शरद पवारांशी बोलले. पवारांनी राज ठाकरेंकडून निवेदनं मागवली. आम्ही ही निवेदनं दिली. तरीही त्यावर निर्णय घेतला गेला नाही. आता तर वीजबिल माफ करणार नसल्याचं ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पवारांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत उरलेली दिसत नाही, असा टोला नांदगावकर यांनी लगावला. (Electricity Bill issue is pending due to Credit War of Congress and Thackeray Government claim MNS)

संबंधित बातम्या:

‘बीएमसी’ निवडणुकीत शिवसेनेशी युती नको, काँग्रेस स्वबळावर : रवी राजा

केडीएमसी घंटागाडी 5 कर्मचाऱ्यांना मारहाण, काम बंद आंदोलनामुळे शहरात कचऱ्याचे ढीग

राज ठाकरेंच्या वीजबिल माफीच्या आंदोलनात भाजपही; बावनकुळेंचं मोठं विधान

संबंधित व्हिडीओ :

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत