AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : आमदार शिंदे गटाचे पण भवितव्य भाजपच्या हातात, बहुमतानंतरही राऊतांचे टीकास्त्र सुरुच

राजकारणात कधी इतिहास विसरायचा नसतो. पण आता राजकीय स्वार्थ साधल्यानंतर अनेकांना त्याचा विसर पडत आहे. इमाम सोडल्यावरच माणुस या स्तराला जातो. आता उद्धव ठाकरे यांच्याबाबतही बंडखोरांच्या मनात राग आहे. शिवसेनेतील याच चार लोकांनी तुम्हाला सत्तेपर्यंत पोहचवले असल्याची आठवणही राऊतांनी बंडखोरांना करुन दिली आहे.

Sanjay Raut : आमदार शिंदे गटाचे पण भवितव्य भाजपच्या हातात, बहुमतानंतरही राऊतांचे टीकास्त्र सुरुच
संजय राऊतImage Credit source: tv9 marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jul 04, 2022 | 5:14 PM
Share

मुंबई : शिवसेनेतील आमदारांच्या बंडापासून ते सत्ता स्थापनेपर्यंत (Sanjay Raut) संजय राऊत हे चर्चेत राहिलेले आहेत. (Rebell MLA) बंडखोर आमदारांनी देखील ही सर्व परस्थिती निर्माण होण्यासाठी त्यांनाच जबाबदार धरले आहे. असे असताना दरम्यानच्या काळात सत्ता स्थापनही झाली मात्र, आरोप-प्रत्यारोप हे सुरुच आहे. आता कुणाला दोष द्यायचा म्हणून मला दोषी ठरवले जात आहे. पण गरज सरो वैद्य मरो अशी भूमिका (Shivsena) शिवसेनेची कधीच राहिलेले नाही. त्यांना जे करायचे होते ते केले आता माझ्यावर आरोप करुन काही उपयोग होणार नसल्याचे राऊतांनी बंडखोरांना सुनावले आहे. शिवाय बंडखोर आणि अपक्ष असे 50 आमदार हे शिंदे गटाकडे आहेत पण त्यांचे भवितव्य हे भाजपाच्या हाती असल्याचे सांगत पुढचा काळ त्यांच्यासाठी अंधकारमय असणार असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

स्वार्थ साधला, जनतेच्या मनाचे काय?

आज जरी बंडखोर आमदार हे निधीचा तुटवडा, हिंदुत्व आणि अनैसर्गिक युती यासारखी कारणे देत असली तरी त्यांनी राजकीय स्वार्थ साधलेला आहे. हे न समजण्या इतपत आता कोणी अडाणी राहिलेले नाही. हा सर्व ड्रामा भाजपाची खेळी आणि नेत्यांचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी होती.यामध्ये ते यशस्वीही झाले असतील पण जनतेला हा निर्णय आवडलेला नाही. उद्या जनतेसमोर जावेच लागेल तेव्हा त्यांचा हा निर्णय योग्य की अयोग्य याता हिशोब तर द्यावाच लागणार आहे. त्यामुळे हा काही उठाव नाही आणि हे मानायला जनता काही तयार नसल्याचे राऊतांनी सांगितले आहे.

आज ज्यांचा द्वेष त्यांच्यामुळेच सत्ता भोगली

राजकारणात कधी इतिहास विसरायचा नसतो. पण आता राजकीय स्वार्थ साधल्यानंतर अनेकांना त्याचा विसर पडत आहे. इमाम सोडल्यावरच माणुस या स्तराला जातो. आता उद्धव ठाकरे यांच्याबाबतही बंडखोरांच्या मनात राग आहे. शिवसेनेतील याच चार लोकांनी तुम्हाला सत्तेपर्यंत पोहचवले असल्याची आठवणही राऊतांनी बंडखोरांना करुन दिली आहे. त्याची परतफेड अशाप्रकारे होईल याची कुणाला कल्पानाही नव्हती. मात्र, पुढे स्वार्थ दिसला की माणुस कोणत्या स्तराला जातो याचे उदाहरण सबंध राज्याने पाहिलेले आहे. त्यामुळे माझ्यावर आरोप करुन आपण काहीच केले नाही अशा अविर्भावात आमदार असल्याचे राऊतांनी सांगितले आहे.

पक्ष कुणाच्या ताब्यात जाणार नाही

शिंदे गटाला मान्यता दिल्याने आता पक्षावरही दावा केला जाणार का असा सवाल नव्याने उपस्थित होऊ लागला आहे. मात्र, आमदार म्हणजेच पक्ष असे नाही तर यामागे उभारले गेलेले संघटन महत्वाचे आहे. मोजकी लोक विकले गेले म्हणजे त्याचा परिणाम ना पक्षावर होणार आहे ना त्या संघटनेवर. कोणताही पक्ष कुणाच्या ताब्यात जाणार नसल्याचे म्हणत शिवसेना ही ठाकरेंचीच राहणार असल्याचे राऊतांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले आहे.

Follow Us
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
मोठी बातमी! प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी... कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?