AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi Speech: विकसीत भारताचं ध्येय गााठण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगतलेले 5 संकल्प नेमके कोणते?

Azadi Ka amrut Mahotshav : वैविध्यपूर्ण संस्कृती असलेल्या भारता एकता आणि एकजुटीचा चौथा संकल्प फार महत्त्वाची भूमिका बजावणारा आहे, असंही ते म्हणाले.

Narendra Modi Speech: विकसीत भारताचं ध्येय गााठण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगतलेले 5 संकल्प नेमके कोणते?
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Aug 15, 2022 | 8:47 AM
Share

नवी दिल्ली : लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi News) यांनी स्वातंत्र्यदिनाचं भाषण करताना भारताचं पुढील 25 वर्षांचं ध्येय (Indian Developed Country) काय असलं पाहिजे, यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी पंचसंकल्पांचा उल्लेख केले. पाच संकल्पांचा जर अवलंब केला, तर भारताला विकसीत देश होण्यापासून कुणीच रोखू शकत नाही, असंही मोदी यांनी म्हटलंय. लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं सलग नववं भाषण केलं. भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन (Azadi Ka Amrit Mahotsav) आज साजरा केला जातोय. या स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करताना मोदींनी भारताला विकसीत देश करण्याचं आपलं लक्ष्य असलं पाहिजे, असं म्हटलं. शिवाय हे लक्ष्य गाठण्यासाठी नेमकं काय करायला हवं, याचा संदेशही देशवासीयांना दिला.

नरेंद्र मोदींनी सांगितलेले 5 संकल्प

  1. विकसीत भारत पहिला संकल्प
  2. गुलामीचा अंश मिटवणं दुसरा संकल्प
  3. आपल्या वाराश्यावर गर्व हवा
  4. एकता आणि एकजुटीला चौथा संकल्प
  5. नागरिकांचं कर्तव्य पाचवा संकल्प

देशाला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष झाली आहेत. यापुढच्या 25 वर्षात देशाला विकसीत देश म्हणून ओळख आपल्याला बनवायची आहे. त्यासाठी इतर देशांनी आपल्याला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही, असा टोलाही मोदींनी लगावला. विकसीत भारत हाच आपला पहिला संकल्प असला पाहिजे. त्यासाठी सर्वच क्षेत्रात आपल्याला काम करावं लागणार आहे. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. त्याचप्रमाणे स्वदेशाची नारा देतही मोदींनी आपल्या देशातील वारशावरही प्रत्येकानं गर्व करायला हवा, असंही म्हटलंय.

पाहा व्हिडीओ :

वैविध्यपूर्ण संस्कृती असलेल्या भारता एकता आणि एकजुटीचा चौथा संकल्प फार महत्त्वाची भूमिका बजावणारा आहे, असंही ते म्हणाले. आत्मनिर्भर भारताचं ध्येय पूर्ण केल्यास भारताला विकसीत करण्याच्या मार्गात कोणताच अडथळा येणार नाही, असंही ते म्हणाले. दरम्यान, त्यासाठी नागरिकांचं कर्तव्य हा पाचवा संकल्प असल्याचं मोदींनी म्हटलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.