काँग्रेसमध्ये धक्कातंत्र सुरुच, आणखी चार दिग्गजांचे राजीनामे

| Updated on: May 27, 2019 | 5:33 PM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा नाट्य सुरु आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजीनाम्याची तयारी दर्शवल्यानंतर आता प्रदेशाध्यक्षही राजीनामा देत आहेत. पंजाब आणि मध्य प्रदेशापासून महाराष्ट्रापर्यंत दिग्गज नेत्यांनी राजीनामा दिलाय. विविध राज्यातील 13 वरिष्ठ नेत्यांनी राजीनामा दिला आहे. सोमवारी काँग्रेसच्या चार प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे पाठवले आहेत. नांदेडकरांना गृहीत धरणं महागात, अशोक चव्हाणांच्या पराभवाचं सखोल […]

काँग्रेसमध्ये धक्कातंत्र सुरुच, आणखी चार दिग्गजांचे राजीनामे
Follow us on

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा नाट्य सुरु आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजीनाम्याची तयारी दर्शवल्यानंतर आता प्रदेशाध्यक्षही राजीनामा देत आहेत. पंजाब आणि मध्य प्रदेशापासून महाराष्ट्रापर्यंत दिग्गज नेत्यांनी राजीनामा दिलाय. विविध राज्यातील 13 वरिष्ठ नेत्यांनी राजीनामा दिला आहे. सोमवारी काँग्रेसच्या चार प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे पाठवले आहेत.

नांदेडकरांना गृहीत धरणं महागात, अशोक चव्हाणांच्या पराभवाचं सखोल विश्लेषण

महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पंजाबमधील प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड, झारखंडचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार आणि आसामचे प्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा यांनी राजीनामा राहुल गांधींना पाठवलाय. जाखड यांचा स्वतःचाच सनी देओलविरुद्ध गुरदासपूरमधून पराभव झालाय. तर अशोक चव्हाण यांचा नांदेडमधून पराभव झालाय.

मी राजीनामा दिलाय, आता राहुल गांधींनी ठरवावं : अशोक चव्हाण

यापूर्वी यूपीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राज बब्बर आणि ओदिशाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनायक यांनीही राजीनामा दिलाय. काँग्रेससाठी सध्या अस्तित्वाची लढाई निर्माण झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकही घेतली. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक जिंकूनही लोकसभेत एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही दिल्लीत बोलावलं जाऊ शकतं.

माजी पंतप्रधान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ते माजी मुख्यमंत्री, दिग्गजांचा पराभव

सुनील जाखड यांचा भाजप उमेदवार आणि अभिनेता सनी देओलने गुरदासपूरमधून पराभव केला. काँग्रेसने पंजाबमध्ये 13 पैकी 8 जागा जिंकल्या आहेत. अकाली दल आणि भाजपने प्रत्येकी दोन, तर आपने एक जागा जिंकली. सुनील जाखड यांनी भावूक पत्र लिहिलंय. काँग्रेस अध्यक्षांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी मला पाठिंबा दिला. तरीही मी जागा वाचवू शकलो नाही. त्यामुळे या पदावर राहणं माझ्यासाठी शक्य नाही, असं जाखड यांनी म्हटलंय.