Gulabrao Patil : लोक सरपंचाची खुर्ची सोडत नाहीत आम्ही मंत्रीपदे सोडली; जे केलं ते शिवसेना वाचवण्यासाठीच केलं – गुलाबराव पाटील

| Updated on: Jul 06, 2022 | 11:18 AM

गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच आम्ही केवळ पक्ष वाचवण्यासाठीच उठाव केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Gulabrao Patil : लोक सरपंचाची खुर्ची सोडत नाहीत आम्ही मंत्रीपदे सोडली; जे केलं ते शिवसेना वाचवण्यासाठीच केलं - गुलाबराव पाटील
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगाव : गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात जोरदार घडामोडी घडल्याचे पहायला मिळाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून (shiv sena) बंडखोरी केली. त्यानंतर शिवसेनेतील एका मोठ्या आमदारांच्या गटाने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. मोठ्यासंख्येने आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्याने महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले. ठाकरे सरकारकडे बहुमत नव्हते. अखेर विश्वासदर्शक ठारावाच्या आधीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. या सर्व घडामोडींना कोण जबाबदार यावरून आता शिवसेना नेते आणि बंडखोर आमदारांच्या गटाकडून एकोनएकांविरोधात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या सर्व प्रकरणावर बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही उद्धव ठाकरेंना आमदारांच्या नाराजीची वेळोवेळी माहिती दिली, पण त्यांनी कधी समजून घेतलं नाही. शेवटी शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केला, असे गुलाबराव पाटील यांनी म्हलटे आहे.

नेमकं काय म्हटलंय पाटलांनी?

राज्यात सुरू असलेल्या सर्व घडामोडींवर गुलाबराव पाटील यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.  आम्ही उद्धव ठाकरेंना आमदारांच्या नाराजीची वेळोवेळी माहिती दिली, पण त्यांनी कधी समजून घेतलं नाही. शेवटी शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केला. लोक ग्रामपंचायत सरपंचाची खुर्ची सोडत नाहीत. आम्ही मंत्रिपदे सोडून उठाव केला. एक नाही तर 8 मंत्रिपदे सोडली, शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केला आहे. अशा शब्दांत आमदार गुलाबराव पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान विशेष अधिवेशनावेळी देखील त्यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला होता. शदर पवार यांचं एवढं वय झालं आहे तरी देखील ते सातत्याने राज्यात फिरत असतात. जयंत पाटील माझ्या मतदारसंघात येऊन गेले. एकनाथ शिंदे देखील आले. मात्र आम्हालाही वाटतं आमचे नेते मतदाससंघात यावेत मात्र तसं कधीही घडल नसल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हलटे होते.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरेंवर निशाणा

दरम्यान विशेष अधिवेशनात बोलताना गुलाबराव पाटील यांनी चहापेक्षा किटली गरम म्हणत आदित्य ठाकरे यांना देखील डिवचले होते. संवादाचा अभाव होता. कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात नव्हता. मतदारसंघात कधी नेतृत्व फिरकल नाही. तसेच हिंदुत्वासाठी भाजप, शिवसेना एकस येणे गरजेचे होते म्हणून आम्ही बाहेर पडलो असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले होते.