AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gulabrao Patil : धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल; गुलाबराव पाटील यांचा मोठा दावा

Gulabrao Patil : बाळासाहेबांची शिवसेना आम्ही उभी करणार आहोत. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो नाही. उलट शिवसेना आम्ही वाचवली आहे.

Gulabrao Patil : धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल; गुलाबराव पाटील यांचा मोठा दावा
धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल; गुलाबराव पाटील यांचा मोठा दावाImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 06, 2022 | 10:00 AM
Share

जळगाव : आम्ही शिवसेना (shivsena) पक्ष वाचवण्यासाठी उठाव केला. शिवसेनेचे जळणारे घर वाचवण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. विधानसभेमध्ये शिवसेना गट म्हणून आम्ही बसलो आहोत. येणाऱ्या काळात शिवसेना म्हणून आमच्या गटाला मान्यता मिळेल व संख्याबळावर धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला मिळेल, असं विधान गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी केले आहे. तब्बल 13 दिवसानंतर गुलाबराव पाटील जळगावात आले होते. यावेळी त्यांचं कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं. ढोलताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. बंड का केलं त्याचं कारणही त्यांनी सांगितलं. तसेच आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावाही त्यांनी केला. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) हे आमच्या मतांवर निवडून आले आहेत. त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन मगच आमच्यावर बोलावं, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते गुलाबराव पाटील मंगळवारी रात्री प्रथमच आपल्या पाळधी येथील निवासस्थानी आले. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार आणि 20 माजी आमदार आमच्या सोबत येणार असल्याचा गौप्यस्फोटही गुलाबराव पाटील यांनी केला आहे. काही खासदारांना आपण भेटलो असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. गुलाबराव पाटील उद्धव ठाकरेंना सोडणार नाही हा कार्यकर्त्यांना विश्वास होता. मात्र उद्धव ठाकरेंना आम्ही सोडलं नाही, उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सोडलं. वेळोवेळी उद्धव ठाकरे यांना सांगूनही त्यांनी ऐकून न घेतल्याने शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही बंडखोरी नव्हे तर उठाव केला, असा दावा त्यांनी केला.

बाळासाहेबांची शिवसेना उभी करणार

बाळासाहेबांची शिवसेना आम्ही उभी करणार आहोत. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो नाही. उलट शिवसेना आम्ही वाचवली आहे. आम्ही बंडखोर नसून आमच्या बाळासाहेबांचे घर जे चौफेर जळत आहे ती आग विझवण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहोत. उद्धव ठाकरे यांना फसवले असून अजूनही उद्धव ठाकरे यांनी सावध राहून फसवणाऱ्या लोकांना दूर करावं, असा सल्लाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

विधानसभेत जोरदार बॅटिंग

गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत जोरदार बॅटिंग केली होती. बंड केल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेत बोलत असताना पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूच्या लोकांवर टीकास्त्र सोडलं. या लोकांमुळेच शिवसेनेचं नुकसान झालं आहे. या चार लोकांच्या कोंड्याळ्यांनी उद्धव ठाकरेंना बावरट केल्याचा दावा त्यांनी केला होता.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.