Uddhav Thackeray : दसरा मेळावा तर शिवतीर्थावरच, पदामुळे बंधने आता रोखठोक भूमिका, पक्षप्रमुखांमध्ये नेमका कोणता बदल दिसणार?

| Updated on: Sep 06, 2022 | 5:18 PM

मला पद पाहिजे असते तर मी ते एवढ्या सहजासहजी सोडलेच नसते. पण तो आपला स्वभाव नाही. रहायचे असेल तर निष्ठा महत्वाचे आहे. पसाभर असण्यापेक्षा मूठभर हे निष्ठावंत असलेले कधीही चांगलेच. त्यामुळे जे गेले त्यांचा विचार न करता शिवसेनेची एक वेगळी रणनीती ठरणार असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी विभागप्रमुखांचे आभारही मानले.

Uddhav Thackeray : दसरा मेळावा तर शिवतीर्थावरच, पदामुळे बंधने आता रोखठोक भूमिका, पक्षप्रमुखांमध्ये नेमका कोणता बदल दिसणार?
उद्धव ठाकरे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : शिवसेनेचा यंदाचा (Dussehra Gathering) दसरा मेळावा नेमका कुठे होणार यावरुन गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरु आहेत. मात्र, काहीही झाले तरी मेळावा हा (Shiv tirtha) शिवतीर्थावरच होणार यावर पक्षप्रमुख आणि आदित्य ठाकरे हे ठाम आहेत. शिवाय आता दसरा मेळाव्यापासून (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या भूमिकेत बदल करणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी विभाग प्रमुखांच्या बैठकीत दिले आहेत. आतापर्यंत मुख्यमंत्री पद होते, त्यामुळे बोलण्यावर मर्यादा होत्या पण आता कुठलीही बंधने नाहीत. त्यामुळे ठाकरेंचा बाणा कसा असेल हे तर दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात पाहवयास मिळणार आहे.

मुख्यमंत्री पदाची भुरळ नव्हतीच

मला पद पाहिजे असते तर मी ते एवढ्या सहजासहजी सोडलेच नसते. पण तो आपला स्वभाव नाही. रहायचे असेल तर निष्ठा महत्वाचे आहे. पसाभर असण्यापेक्षा मूठभर हे निष्ठावंत असलेले कधीही चांगलेच. त्यामुळे जे गेले त्यांचा विचार न करता शिवसेनेची एक वेगळी रणनीती ठरणार असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी विभागप्रमुखांचे आभारही मानले.

सर्वांसाठी दरवाजे उघडे

निष्ठेने पक्षाचे काम केले तरच उद्या चांगला दिवस उजाडणार आहे. शिवाय अनेकांनी साथ सोडली म्हणून विचारावर आणि पक्षाच्या धोरणावर त्याचा परिणाम होणार नाही. अजूनही सर्वांसाठी दरवाजे हे खुले आहेत. ज्यांना रहायचे आहे ते राहतील आणि ज्यांना जायचे असेल त्यांच्यासाठी दरवाजे हे खुलाच आहे असेही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यापासून सेनेचे बदललेले स्वरुप पाहवयास मिळणार का हे देखील औत्सुक्याचे असणार आहे.