AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Alliance News : कमी मतं मिळाली असतानाही भाजप सत्तेत, कसं ते अशोक चव्हाण यांनी सांगितलं

इंडिया आघाडीची उद्या आणि परवा दोन दिवस मुंबई बैठक होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

India Alliance News : कमी मतं मिळाली असतानाही भाजप सत्तेत, कसं ते अशोक चव्हाण यांनी सांगितलं
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Aug 30, 2023 | 4:36 PM
Share

मुंबई : मुंबईत इंडिया (India) आघाडीची पत्रकार परिषद (Press Conference) झाली. या परिषदेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेनेच्या उबाटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. अशोक चव्हाण म्हणाले, महागाई, बेरोजगारी विरोधात नेहमी आवाज उठवत असतो. २०१९ च्या निवडणूक इंडियातील घटकपक्षांनी २३ कोटी मतं घेतले होते. भाजपला फक्त २२ कोटी मतं मिळाली होती. कमी मतं मिळाली असताना भाजप सत्तेत आले. कारण त्यावेळी इंडियातील काही घटकपक्ष एकत्र लढू शकले नव्हते. यावेळी हे सर्व पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत नक्की जिंकण्याचा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले, या इंडियाच्या आघाडीत ११ मुख्यमंत्री सहभागी आहेत. मध्यप्रदेश, गोवा आणि महाराष्ट्राला तोडण्याचे काम भाजपने केले. कर्नाटकात मात्र सरकार फोडल्यानंतर काँग्रेसची सरकार पुन्हा आली.

विकासाची काम करायची आहेत

राज्यात पुन्हा इंडियाची सरकार येईल, असा आम्हाला विश्वास आहे. सर्व राजकीय पक्ष आमच्यासोबत आहेत. कोणाला विरोध करणे हा आमचा अजेंडा नाही. विकासाची कामं करायची आहेत. शिवाय देशातील फॅसिस्ट विचारसरणी थांबवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

राज्य संकटात असताना मदत केली पाहिजे

उद्धव ठाकरे म्हणाले, महिलांना राज्यात, देशात सुरक्षित वाटलं पाहिजे. सरकार गॅसवर आहे. त्यामुळे सिलेंडरचे दर कमी केलेत. उद्या आणि परवा इंडियाची बैठक होत आहे. राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. राज्य आणि केंद्र सरकार काय करत आहे. संकटात असताना मदत केली पाहिजे. येऊन फक्त भुलभुलय्या करून चालत नाही, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलोत

विचारधारा वेगवेगळी आहे. पण, संविधानाचे रक्षण करायची आहे. देशात हुकुमशाही सुरू आहे. चले जावो, असं ब्रिटीशांना म्हटलं होतं. विकासासोबत स्वातंत्र्य पाहिजे. याचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. ही शपथ घेऊन पुढे जाणार आहोत, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत