AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने प्रवास का करतात? श्रीकांत शिंदे यांनी भरसभेत कारण सांगितलं…

Shrikant Shinde on CM Eknath Shinde Helicopter Travel : मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने गावी जातात, कारण...; श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं कारण

मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने प्रवास का करतात? श्रीकांत शिंदे यांनी भरसभेत कारण सांगितलं...
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 17, 2023 | 3:03 PM
Share

कल्याण : खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टर प्रवासावर भाष्य केलंय. हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री गावी जातात. कारण त्याच्याकडे वेळ नाही. आज एक-एक क्षण त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. आम्ही सर्वत्र फिरतो हे काही लोकांच्या डोळ्यांत खुपतं आहे, असं श्रीकांत शिंदे म्हणालेत. सरकारमध्ये मंत्री आमदार बाहेर जातात. तेव्हा शिंदेसाहेबांना माहिती नव्हतं हे सरकार बनेल. बाळासाहेबांचा स्वप्न ज्यांनी पूर्ण केलं. त्यामुळे भाजपसोबत आम्ही युती केली. त्याचा आम्हाला अभिमान आहे, असंही ते म्हणालेत. ते कल्याणमध्ये बोलत होते.

विरोधक या सरकारला शिव्याशाप देतात. मला वाटतं झोपेमध्ये पण एकमेकांना तेच बोलत असतील. माझ्यावरही आळ घेतला तेव्हा पण तोंडावर पडले आता ही तोंडावर पडले, असं म्हणत संजय राऊत यांच्यावर श्रीकांत शिंदे यांनी टीका केली आहे.

दोन वेळा मला आणि शिंदे साहेबांना दोन वेळा कोविड झाला.तरी आम्ही सर्व कामं केली आणि आपण आपली टिमकी वाजवतात. कोणी तरी बॅनर लावतात. आम्हाला निधी माध्यमातून खूप खोके देतात. आमच्याकडून कोण तुमच्याकडे आले का ?, असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाला सवाल केलाय.

मुंबईत रस्ते नाही मात्र हे जे जिथे जातात तिथे शिकून येतात आणि मुंबईत नाईट लाईफ पाहिजे बोलतात, असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केलीय.

350 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकला यायला यांना वेळ नाही. दोन दिवसआधी युवराजांचा वाढदिवस झाला. मात्र तेव्हा ही यांना लोकांना भेटण्यासाठी यांना वेळ नाही म्हणून या गोष्टी घडल्या, असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर टीका केलीय.

खोके एवढे त्यांच्या डोक्यात घुसले आहेत. कार्यकर्ता खाली राबला आणि आपण ऑनलाइन मार्गदर्शन केला तरी तुम्ही टॉप 5 मध्ये आहात. शिंदे साहेबांने तुम्हाला जीव लावला. कुठली आपत्ती आली तर शिंदे साहेबांना सांगितलं जायचं. मग आता शिंदे आपल्याला खुपायला का लागले, असं श्रीकांत शिंदे म्हणालेत.

विरोधकांना दुसरं काही काम उरलेलं नाही. विरोधकांना एकच काम आहे, युतीत वितुष्ट कसं निर्माण होईल. यांच्यामध्ये लाव्यालावी कशा करायच्या हेत त्यांचं ध्येय आहे, असं श्रीकांत शिंदे म्हणालेत.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार