AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“भाजपमध्ये गेलेल्या अनेकांचे आम्हाला फोन, राजकारणात बेरजेचं राजकारण महत्त्वाचं”

राजकारणात बेरजेचं राजकारण फार महत्त्वाचं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केलं (Jayant Patil on NCP rebellion Leaders).

भाजपमध्ये गेलेल्या अनेकांचे आम्हाला फोन, राजकारणात बेरजेचं राजकारण महत्त्वाचं
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Dec 09, 2019 | 8:32 AM
Share

सांगली : भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांनी आम्हाला फोन करुन संपर्क केला आहे. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी बेरजेचं राजकारण सुरु केलं. राजकारणात बेरजेचं राजकारण फार महत्त्वाचं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केलं (Jayant Patil on NCP rebellion Leaders). ते सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे बोलत होते. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच इस्लामपूरमध्ये आलेल्या जयंत पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. तसेच जंगी मिरवणुकही काढण्यात आली (Jayant Patil on NCP rebellion Leaders).

जयंत पाटील म्हणाले, “देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीनंतर इतकं मोठ राजकारण घडलं आहे. टीव्ही लावला की जनतेला सकाळी एक, दुपारी दुसरं आणि रात्री तिसरंच राजकारण बघायला मिळालं. पण जनतेचं मत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचं आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्र येण्याचं होतं. त्यामुळे तशा राजकीय घडामोडी घडल्या.”

“2024 मध्ये राष्ट्रवादी हा राज्यातील एक नंबरचा पक्ष होईल”

राष्ट्रवादीचा 50 आमदारांचा आकडा पूर्ण केल्यावर आम्हाला सोबत घेतल्याशिवाय कोणीही सरकार स्थापन करु शकणार नव्हतं. त्याप्रमाणेच झालं. 2024 मध्ये राष्ट्रवादी हा राज्यातील एक नंबरचा पक्ष होईल, असा प्रयत्न करू, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

“कर्जमाफीच्या आधी राज्याच्या तिजोरीची स्थिती बघावी लागणार”

सत्ता आल्यावर लगेच दुसऱ्याच दिवशी कर्जमाफी बाबत विचारणा होते आहे. मात्र या बाबत थोडा वेळ द्यावा लागेल. राज्याची तिजोरी स्थिती बघावी लागणार आहे, मात्र थोड्या दिवसात आम्ही योग्य निर्णय घेणारच आहे, अस ही यांनी सांगितलं.

Follow Us
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत...
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत मोठी खलबत
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते.
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते टार्गेट, राजकारण तापलं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग
DCM Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग, चर्चांना उधाण!