LIVE : कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय जाहीर करतील – जयंत पाटील

| Updated on: Dec 19, 2019 | 2:11 PM

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट

LIVE : कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय जाहीर करतील - जयंत पाटील
Follow us on

[svt-event title=”कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय जाहीर करतील – जयंत पाटील” date=”19/12/2019,2:11PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्र्यांसोबत विविध विषयांवर चर्चा झाली. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय जाहीर करतील. मंत्रिमंडळ विस्तार हा मुख्यमंत्र्याबचा अधिकार. विरोधक आक्रमक कुठे आहेत?ते फक्त कांगावा करत आहेत – जयंत पाटील [/svt-event]

[svt-event title=”पाहून सौख्य माझे, … देवेंद्र तोही लाजे : उद्धव ठाकरे ” date=”19/12/2019,12:56PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बुलेट ट्रेनपेक्षा तीनचाकी रिक्षा गरिबांनी परवडणारी – मुख्यमंत्री” date=”19/12/2019,11:18AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”उद्धव ठाकरेंना पद मिळाल्यावर शेतकऱ्यांशी बेईमानी झाली – बबनराव लोणीकर ” date=”19/12/2019,11:00AM” class=”svt-cd-green” ] अधिवशेनाचा आज चौथा दिवस आहे, पण अद्याप मदत दिली नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडून अनेक अपेक्षा होत्या. पण सत्ता मिळाल्यावर, पद मिळाल्यावर शेतकऱ्यांशी बेईमानी झाली आहे. 25 हजार हेक्टरी मदत केलीच पाहिजे – भाजप आमदार बबनराव लोणीकर [/svt-event]

[svt-event title=”शेतकऱ्यांना 25 हजार विधानसभेत मंजूर झाले नाही तर रस्त्यावर उतरु – राधाकृष्ण विखे पाटील” date=”19/12/2019,10:57AM” class=”svt-cd-green” ] आज महाराष्ट्रातील शेतक-यांचं, सगळ्यांचं लक्ष विधानसभेकडे आहे. पण मदत होत नाही. रोज यांना मदत करा ही आठवण करुन द्यावी लागते. सामनाकडे लक्ष वेधून 25 हजारांचा प्रश्न सुटणार आहे का? बांधावर गेल्यावर काय म्हणाले होते हे पहा. कर्जमाफी नंतर देणार याबद्दल समजू शकतो, पण 25 हजार देणार हे मान्यच करा. विधानसभेत मंजुर झाली नाही तर रस्त्यावर उतरुन मंजुर करुन घ्यावं लागेल – राधाकृष्ण विखे पाटील [/svt-event]

[svt-event title=”विधीमंडळ अधिवेशनाचा चौथा दिवस” date=”19/12/2019,10:55AM” class=”svt-cd-green” ] विधीमंडळ अधिवेशनाचा चौथा दिवस, विरोधकांचा चौथ्या दिवशीही गदारोळ, भाजप आमदारांकडून शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपचं आंदोलन [/svt-event]

[svt-event title=”हे भाई लोकांचं सरकार, जनतेचे रक्षण करु शकत नाही : किरीट सोमय्या” date=”19/12/2019,10:49AM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेकडून जीवाला धोका असल्याबाबत तक्रार भाजपनेते किरीट सोमय्या यांनी राज्यपालांना पत्र लिहून केली आहे. सोमय्या यांच्या फेसबुक पोस्टवर आलेल्या कमेंटमध्ये सोमय्यांना धमकीच्या आशयाचे संदेश असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवसैनिकांकडून आलेली धमकी, त्याचवेळेला नागपुरात महापौरांवर होणारा गोळीबार आणि मुंबईतील विक्रोळी भागात शिवसेनेच्या उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर झालेला गोळीबार, यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. पण हे भाई लोकांचं सरकार आहे ते जनतेचे रक्षण करू शकत नाही अशी टिप्पणी किरीट सोमय्यांनी केली आहे. [/svt-event]

[svt-event title=”खडसे-पवार भेटीची माहिती नाही – जयंत पाटील ” date=”19/12/2019,10:48AM” class=”svt-cd-green” ] एकनाथ खडसे- शरद पवार यांची भेट झाल्याची मला माहिती नाही. खडसे प्रवेश याबाबत मला काही कल्पना नाही. आज शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे – जयंत पाटील [/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरे यांच्या भेटीबद्दल अजून ठरले नाही – मल्लिकार्जुन खर्गे ” date=”19/12/2019,10:48AM” class=”svt-cd-green” ] आज आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यात आमदारांना मार्गदर्शन करणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजून मला माहिती नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीबद्दल अजून ठरले नाही. – मल्लिकार्जुन खर्गे [/svt-event]

[svt-event title=”नागपूर जिल्हा परिषद निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार?” date=”19/12/2019,10:50AM” class=”svt-cd-green” ] नागपूर जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी मिळून लढावी का? यासंदर्भात आज तिन्ही पक्षाच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांची बैठक शक्य आहे. जिल्हा पातळीवरच्या बैठकीत तत्वतः महाविकास आघाडी मिळून निवडणूक लढेल असे ठरले होते. [/svt-event]