AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai High Court : उस्मानाबादचं धाराशिव करण्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका, उद्या सुनावणी

Osmanabad Dharashiv : उस्मानाबादचं धाराशिव करण्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका

Mumbai High Court : उस्मानाबादचं धाराशिव करण्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका, उद्या सुनावणी
मुंबई उच्च न्यायालयImage Credit source: twitter
| Edited By: | Updated on: Jul 31, 2022 | 7:23 AM
Share

उस्मानाबाद : उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचे धाराशिव (Dharashiv) नामांतरण विरोधबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. उस्मानाबाद येथील राष्ट्रवादीचे प्रदेश पदाधिकारी मसुद शेख व इतर 16 जणांनी याचिका दाखल केली. 1 ऑगस्ट रोजी म्हणजेच उद्या याचिकेवर सुनावणी होणार असून ऍड सतीश तळेकर मार्फत याचिका दाखल केली आहे. उस्मानाबाद नामांतरण विरोधात मसुद ईस्माईल शेख,कादरखान, नगरसेवक खलिफा कुरेशी,आयाज हारून शेख,जफर अली मोमिन,असद खान पठाण, ईस्माईल बाबा शेख, वाजिद पठाण निजामोद्दीन[बाबा] मुजावर, बिलाल तांबोळी, मन्नान काझी आतिक शेख, समियोद्दीन मशायख, अफरोज पिरजादे, ईम्तियाज बागवान व ईलियास पिरजादे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल करण्यात आली.

नामांतराविरोधात जनित याचिका

उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामांतरण विरोधबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. उस्मानाबाद येथील राष्ट्रवादीचे प्रदेश पदाधिकारी मसुद शेख व इतर 16 जणांनी याचिका दाखल केली. 1 ऑगस्ट रोजी म्हणजेच उद्या याचिकेवर सुनावणी होणार असून ऍड सतीश तळेकर मार्फत याचिका दाखल केली आहे. समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आजमी यांनी नामांतरणला विरोध करण्यासाठी उस्मानाबाद येथे बैठक घेऊन विरोध दर्शविला आहे.

मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिंदे भाजप सरकारने 16 जुलै 2022 रोजी उस्मानाबादचे धाराशिव नामातरण करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी ठाकरे महाविकास आघाडी सरकारने नामांतरण निर्णय घेतला. मात्र सरकार अल्पमतात असताना हा निर्णय घेतल्याने कायदेशीर पेचप्रसंग नको म्हणून तो पुन्हा घेण्यात आला.

काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना या महाविकास आघाडी सरकारने 29 जुन रोजी मंत्रिमंडळ बैठकीत नामकरण निर्णय घेतला, या निर्णयाला काँग्रेस राष्ट्रवादीने सहमती दिली होती.उस्मानाबादचे धाराशिव नामांतरण निर्णय घेतल्यानंतर उस्मानाबाद येथील नाराज झालेल्या काँग्रेसचे खालील सय्यद, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव मसुद शेख यांच्यासह 50 पदाधिकारी यांनी पक्षाचे राजीनामे दिले तर मुस्लिम समाजाने एकत्र येत निवेदन दिले. समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आजमी यांनी नामांतरणला विरोध करण्यासाठी उस्मानाबाद येथे बैठक घेऊन विरोध दर्शविला आहे.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.