सोशल मीडियावर राजकारण्यांचे ‘ट्रोल’युद्ध!

| Updated on: Nov 20, 2019 | 12:11 AM

सोशल मीडियाचा वापर करत राजकारणी एकमेकांच्या विरोधात तोफ डागण्याचे काम करताना दिसत (political trolling social media) आहेत.

सोशल मीडियावर राजकारण्यांचे ट्रोलयुद्ध!
'माघ मेला'मध्ये टेक्नेलॉजीसह सोशल मीडियाचा वापर
Follow us on

मुंबई : लोकसभेच्या 2014 आणि 2019 च्या निवडणुकांनंतर सोशल मीडिया हे प्रभावी वापराचे साधन (political trolling social media) बनले आहे. भाजपने याच सोशल मीडियाच्या आधारे देशात सत्ता मिळवली. सध्या याच सोशल मीडियाचा वापर करत राजकारणी एकमेकांच्या विरोधात तोफ डागण्याचे काम करताना दिसत (political trolling social media) आहेत. राज्यातील राजकीय घडामोडीवर शिवसेना नेते संजय राऊत दररोज ट्विटरवर माध्यमातून भाजपला टार्गेट करत आहेत. तर भाजपही त्याला प्रत्युत्तर देत शिवसेनेची कोंडी करताना दिसत (political trolling social media) आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. पण निकाल लागून 3 आठवडे उलटूनही सत्तासंघर्ष कायम आहे. याच सत्तासंघर्षामुळे भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, या सर्व पक्षांचे नेते मोठ्या प्रमाणावर ट्विटरच्या माध्यामातून एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. शिवसेनेचे संजय राऊत विधानसभा निवडणुकीनंतर दररोज ट्विट करतात. तर काँग्रेसदेखील यात कुठेही मागे नाही. भाजपचे आशिष शेलार यांनी देखील ट्विट करुन सेनेला इशारा केला होता.

याच संकेतस्थळ आणि सोशल मीडियावर होणारी टीका खोडून काढण्यासाठी काही राजकीय पक्षांनी स्वतंत्र टीम तयार केली आहे. एखाद्याने मत व्यक्त केल्यानंतर त्यावर प्रतिक्रियांचा भडिमार केला जातो. त्यावरुन ट्रोल युद्धच सुरु (political trolling social media) होते.

ट्विटरच्या माध्यमातून एकमेकांना टार्गेट करत राजकारणी आपला रोष काढत असले, तरी हा रोष तेवढया पुरता ठेऊन जनतेच्या हितासाठीदेखील दाखवला पाहिजे. अशी भावना सर्वसामान्य व्यक्त करताना दिसत आहे.