ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का, ऐन वेळी निवडणुकीत पराभव, सुवेंदू अधिकारी यांचा दणदणीत विजय!

ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. भवानीपूर येथून त्यांचा पराभव झाला आहे. 15 हजार मतांनी त्याचा पराभव झाला आहे.

ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का, ऐन वेळी निवडणुकीत पराभव, सुवेंदू अधिकारी यांचा दणदणीत विजय!
mamata banerjee
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 04, 2026 | 9:40 PM

Mamata Banerjee Election Result : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा ऐतिहासिक विजय झाला आहे. सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला पाणी पाजत भाजपाने तेथे सत्ता खेचून आणली आहे. दुसरीकडे काहीही झालं तरी आम्हीच निवडणूक जिंकणार असं म्हणणाऱ्या तृणमूल काँग्रेसला या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत तृणमूलचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले आहेत. या पक्षाच्या सर्वेसर्वा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा या निवडणुकीत विजय होणार की पराभव? याकडे संपूर्ण देशाचेच लक्ष लागले होते. दरम्यान, आता ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर या मतदारसंघाचा निकाल समोर आला असून ममता बॅनर्जी यांना जबर धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी यांचा या मतदारसंघातून पराभव झाला आहे. विशेष म्हणजे भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी तब्बल 15 हजार मतांनी ममता बॅनर्जी यांना पराभूत केले आहे.

सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

मतदानाला सुरुवात झाली तेव्हापासून या जागेवरून कधी ममता बॅनर्जी आघाडीवर जात होत्या. तर कधी सुवेंदू अधिकारी मसुंडी मारताना दिसत होत्या. अजूनही त्या जागेवरची मतमजोणी चालूच होती. आता तेथील निकाल स्पष्ट झाला आहे. भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. पक्षाच्या सर्वेसर्वा असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनाच पराभवाला समोरे जावे लागल्याने तृणमूलासाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

कोणाला किती मतं पडली

सुवेंदू अधिकारी या जागेवरून 15114 मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. त्यांना एकूण 73463 मतं मिळाली आहेत. या विजयानंतर त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. ममता बॅनर्जी यांना पराभूत करणे फार महत्त्वाचे होते. हिंदू मतदारांनी मला विजयापर्यंत नेलं. आमच्या मेहनतीला फळ लागले आहे, अशी प्रतिक्रिया सुवेंदू अधिकारी यांनी व्यक्त केली.

कोणत्या पक्षाला किती जागा?

पश्चिम बंगालमध्ये एकूण 293 जागांसाठी निवडणूक झाली होती. यापैकी 208 जागांवर भाजपाचा विजय झाला आहे. तर तृणमूल काँग्रेसचा फक्त 79 जागांवर विजय झाला आहे. काँग्रेसला दोन जागा तर डाव्या पक्षांना दोन जागा मिळाल्या आहेत. एमआयएम पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही.

Follow Us