AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj jarange Patil | जालना ते मुंबई अंतर 350 किमीपेक्षा जास्त, रोज 60 किमी चालायचय, मनोज जरांगे काय म्हणाले?

Manoj jarange Patil | "आपण आहोत तो पर्यंत आरक्षण मिळवून देऊ, नंतर हाल होतील आताच सावध व्हा. नाईलाज आहे. मराठ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की, घरी बसू नका. आपल्या पश्चात लेकरांचे हाल होतील" असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj jarange Patil | जालना ते मुंबई अंतर 350 किमीपेक्षा जास्त, रोज 60 किमी चालायचय, मनोज जरांगे काय म्हणाले?
Manoj Jarange Patil
| Updated on: Dec 27, 2023 | 11:47 AM
Share

जालना : मुंबईतील आंदोलनाबाबत उद्या पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देऊ असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. मागास आयोगाने फक्त मराठा समाजाच नाही, इतर समाजाच सुद्धा मागसलेपण तपासणार असं म्हटलय. त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “मागास आहेत की नाही हे तपासण गरजेच आहे. हे माझ व्यक्तीगत मत आहे” “सरकारने ठरवलय ते सरकारच्या हातात आहे. सरकारच्या डोक्यात, मनात जे आहे, ते करतय. मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण मिळवून देण्यासाठी आमची लढाई आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “मराठा आणि कुणबी एकच असल्याचे हजारो पुरावे आहेत. मराठा आणि कुणबी एकच असल्याच सिद्ध झालय, तर कशाला विनाकारण फुफाटयात ढकलताय” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“मराठा समाजाला टिकणार आरक्षण मिळाल पाहिजे. 50 टक्क्यांच्या वर गेलं की आरक्षण उडतं” असं जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे यांची भूमिका धरसोडपणाची आहे, त्यांना मुंबईला येण्याची गरज नाही, असं विखे पाटील म्हणाले. “उगाच मागे बोलू नका. धरसोडपणा तुम्ही केला. सगळ्या महाराष्ट्रात सॉफ्टवेअर का नाही दिले? त्यामुळे मोडी लिपीद्वारे नोंदी तपासता आल्या असत्या” असं उत्तर जरांगे पाटील यांनी दिलं. “20 तारखेच्या आत आरक्षणाचा प्रश्न मार्गी निघाला, तर मुंबईत जाण्याची गरजच उरणार नाही. आमच्या पोरांच वाटोळ होईल म्हणून आम्ही आरक्षणावर ठाम आहोत” असं जरांगे पाटील म्हणाले.

‘आपल्या पश्चात लेकरांचे हाल होतील’

“मुंबईत चाललोय. आता गोळ्या घातल्या तरी आरक्षणाशिवाय माघार नाही. मी माझ्या समाजासाठी ताकत, जीव पणाला लावायला तयार आहे. पोरांची संधी गेली, तर हाल होतील. म्हणून मराठा समजाला आवाहन आहे की, त्यांनी आपण आहोत तो पर्यंत आरक्षण मिळवून देऊ, नंतर हाल होतील आताच सावध व्हा. नाईलाज आहे. मराठ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की, घरी बसू नका. आपल्या पश्चात लेकरांचे हाल होतील” असं मनोज जरांगे म्हणाले.

जालना ते मुंबई अंतर किती?

अंतरवली सराटी ते मुंबई अंतर 350 किमीपेक्षा जास्त आहे. एका दिवसात 60 किमी अंतर चालाव लागणार आहे. हे शक्य होईल का? अनेक लोकांना त्रास होऊ शकतो यावर लोकांच्या हिशोबाने चालू असं उत्तर मनोज जरांगे यांनी दिलं. कारण मनोज जरांगे 20 जानेवारीला गावातून निघतील. मुंबईत 26 जानेवारीला पोहोचण्याच लक्ष्य आहे.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.