Manoj Jarange on Amruta Fadnavis: भाऊ म्हणणाऱ्या अमृता फडणवीस यांना जरांगे यांचे स्पष्टच उत्तर, संकटात असताना….

Manoj Jarange on Amruta Fadnavis: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांच्या एका विधानाची चर्चा सुरू झाली आहे. ‘मनोज जरांगे हे माझे भाऊ आहेत’ असं म्हणत त्यांनी जरांगेंना घरी जेवणाचं निमंत्रण दिलं. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

Manoj Jarange on Amruta Fadnavis: भाऊ म्हणणाऱ्या अमृता फडणवीस यांना जरांगे यांचे स्पष्टच उत्तर, संकटात असताना....
| Updated on: Sep 10, 2026 | 11:53 AM

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांच्या एका विधानाची चर्चा सुरू झाली आहे. ‘मनोज जरांगे हे माझे भाऊ आहेत’ असं म्हणत त्यांनी जरांगेंना घरी जेवणाचं निमंत्रण दिलं. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

अंतरवाली सराटीमधून माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ‘हे बघा ताईंनी सांगितलं आहे ना मग जेवायला पण जाऊ ना. ताईंनी सांगितलं ना पण भाऊबीजेच्या वेळी. आता आंदोलन सुरु आहे. आता बहिणीने या वेळी बोलवू नये. भाऊ मैदानात असताना बोलवू नये. भाऊ संकटात जातो. बहिणीने तेवढा तरी बारकाईने विचार करावा आमचा. आज मात्र जेवायला बोलवू नये. आमच्या बहिणींने आम्हाला भाऊबीजेला बोलवावं साडी चोळी घेऊन जातो. दिलेला शब्द आहे मनोज जरांगेचा. साडी चोळी घेऊन जातो. जेवयला जातो. फक्त आज लढायच्या मैदानातून तुम्ही जेवायला या म्हणाल तर हार पत्कारावी लागेल ताई. ताईने तो विचार आणि दृष्टीकोन आणि ती मायेची भावना आमच्या बाजूने ठेवावी’.

ताईने ज्या भावनेने आपल्याला आवाहन केले…

पुढे ते म्हणाले की, “एखादा माणूस चांगल्या भावनेनं एखादा विषय म्हणाला तर माणसाने प्रत्येक वेळी आड्यव्यात घुसायची गरज नाही. प्रश्न आणि त्याचे उत्तर ताईने ज्या भावनेने आपल्याला आवाहन केले आहे, ज्या मायेने दयेने केले आहे त्याच मायेने दयेने आपण दिले आहे. पण फक्त आताची ती वेळ नाहीये जेवायची एवढंच म्हणणं आहे. शिकारीच्या टायमाला इकडे तिकडे जाणे योग्य नाही.”

“ताईकडे जातो ना. साडी-चोळी घेऊन जातो”

शेवटी ते म्हणाले की, “भावाचं नातं लावल्यानंतर आपण भाऊबीजेला जाऊ ना आपण त्यात अडचण नाही. पण आज भाऊ इकडे संकटात आहे. कोणाच्या तरी गरीबाच्या लेकरासाठी लढत आहे. त्यावेळी जेवायला गेल्यावर कसं होणार? ताईकडे जातो ना. साडी-चोळी घेऊन जातो पण भाऊबीजेच्या वेळी.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us