AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खेकड्यांना जपलं असतं तर…; उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ वक्तव्याला गुलाबराव पाटलांचं उत्तर

Gulabrao Patil on Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरे अकार्यक्षम मुख्यमंत्री, न्याय दिला नाही; शिवसेनाच्या आमदारांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात

खेकड्यांना जपलं असतं तर...; उद्धव ठाकरे यांच्या 'त्या' वक्तव्याला गुलाबराव पाटलांचं उत्तर
| Updated on: Jul 25, 2023 | 3:42 PM
Share

मुंबई |  25 जुलै 2023 : ‘आवाज कुणाचा’ या शिवसेना ठाकरे गटाच्या मुलाखत सत्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत होणार आहे. या मुलाखतीचा टीझर प्रकाशित झाला आहे. यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना- शिंदेगटावर आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्याला आता शिवसेनेच्या आमदारांनी उत्तर दिलं आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

मुलाखतीदरम्यान तुमच्या नेतृत्वाखालचं सरकार वाहून गेलं…, असा सवाल संजय राऊतांनी विचारला त्यावर सरकार वाहून गेलं नाही. तर खेकड्यांनी ते पोखरलं, असं उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. या टीकेला आता गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

गुलाबराव पाटलांचं उत्तर

आम्हाला खेकडा म्हणता तर म्हणा. पण लक्षात ठेवा खेकडाच कावीळवर योग्य पर्याय ठरतो. या खेकड्यांना जपलं असतं तर शिवसेना फुटली नसती, असा घणाघात गुलाबराव पाटलांनी केला आहे.

बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाताय ही चांगली बाब आहे. आम्हाला एक कळत नाही आमचा दोष काय होता? आता कोण कुठे जाऊन मुजरा करतो हे पाहावं लागेल… तुम्ही दिल्लीत जाऊन राम राम करायचा तेव्हा काय?, असा प्रतिसवाल गुलाबराव पाटलांनी केली आहे.

तर आमदार संजय शिरसाट यांनीही ठाकरेंवर पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला न्याय दिला नाही, म्हणून उठाव झाला, असं संजय शिरसाट म्हणालेत.

आमदार संजय गायकवाड यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे अकार्यक्षम मुख्यमंत्री होते, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत.

ठाकरेंच्या मुलाखतीचा टीझर

उद्धव ठाकरे यांची उद्या एक मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. यात संजय राऊत त्यांची मुलाखत घेणार आहेत. संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांची उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिली आहेत.

भाजप म्हणतं की तुम्ही पाठीत खंजीर खुपसला, असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला तेव्हा मी जर खंजीर खुपसलं, असं म्हणता मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं? तुम्ही राष्ट्रवादी पक्ष का फोडला, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

Follow Us
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....