AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना म्हणजे अग्निकुंड, शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणं; काय म्हणाले संजय राऊत? वाचा…

Sanjay Raut on Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : ईडी, दहशतवादी संघटना अन् शिवसेना; 'आवाज कुणाचा' मुलाखतीचा टीझर प्रदर्शित.... शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची 'आवाज कुणाचा' या पॉडकास्टच्या माध्यमातून मुलाखत प्रसिद्ध होणार

शिवसेना म्हणजे अग्निकुंड, शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणं; काय म्हणाले संजय राऊत? वाचा...
| Updated on: Aug 10, 2023 | 10:26 AM
Share

मुंबई | 10 ऑगस्ट 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टच्या माध्यमातून मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. यात संजय राऊत यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केलं आहे. याचा टीझर काल प्रदर्शित झाला. यात संजय राऊत यांनी शिवसेनेच्या इतिहासावर भाष्य केलं. देशातील तपास यंत्रणांवर भाष्य केलं आहे. विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या टीकेवरही संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेना म्हणजे अग्निकुंड, शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणं, असं म्हणत त्यांनी भाजपला सुनावलं आहे. ईडी ही एक दहशतवादी संघटना आहे, असं वक्तव्यही राऊतांनी केलं आहे.

संजय राऊत यांची सविस्तर मुलाखत आज आणि उद्या संध्याकाळी पाच वाजता प्रसारित होणार आहे. ठाकरेगटाचे सचिव आदेश बांदेकर ही मुलाखत घेणार आहेत. यात संजय राऊत आपल्या शैलीत विरोधकांवर तोफ डागताना दिसणार आहेत. तर याआधीही ‘आवाज कुणाचा’मधून ठाकरे गटातील नेत्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. उद्धव ठाकरे, अनिल परब, कैलास पाटील, नितीन देशमुख यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत.

मराठी माणूस, त्याला तुम्ही भिकारी, दरिद्री म्हणत होता, घाटी, कोकणी म्हणून हिणवत होता, त्या माणसाला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी ही शिवसेना स्थापन झाली. आता मित्र पक्षांनी फसवलं, म्हणून शिवसेना थांबली का? शिवसेना संपली का?, असं या टीझरमध्ये संजय राऊत म्हणत आहेत.

शिवसेना म्हणजे अग्निकुंड आहे. शिवसेना म्हणजे आग आहे. शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणं!, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला ललकारलं आहे. शिवसेना ही सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. शिवसेना ही महाराष्ट्रासाठी संघर्ष करण्यासाठी जन्माला आली आहे. शिवसेना विझली तर महाराष्ट्रातील आग संपेल, असं ते म्हणालेत.

भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने आमच्याशी वर्तवणूक केली. त्याला आता क्षमा केली जाणार नाही. भाजपचे लोक घाबरतात. महापालिका निवडणुका घेत नाही, लोकसभा निवडणूक तरी ते घेतील का? ही चिंता आहे. भाजप जनतेला घाबरतं. जो जनतेला घाबरतो तो नेता नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर तोफ डागली आहे.

उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं नेतृत्व स्वीकारल्यापासून त्यांनी बाळासाहेबांची संघटना दोन पावलं पुढे नेली आहे. त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी विस्तारासाठी प्रयत्न केले, असं संजय राऊत म्हणाले.

Follow Us
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.