AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : बंडखोरी रोखण्यासाठी शेवटचा 1 तास, उद्धव ठाकरेंच महत्त्वाच स्टेटमेंट

Uddhav Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. 29 ऑक्टोंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज किती उमेदवार निवडणूक रिंगणात राहतील? ते चित्र स्पष्ट होईल. 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. 23 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

Uddhav Thackeray : बंडखोरी रोखण्यासाठी शेवटचा 1 तास, उद्धव ठाकरेंच महत्त्वाच स्टेटमेंट
उद्धव ठाकरेImage Credit source: ANI
| Updated on: Nov 04, 2024 | 2:00 PM
Share

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचा एक तास उरला आहे. त्याआधी महाविकास आघाडीकडून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी रोखण्यासाठी मविआकडून काय प्रयत्न सुरु आहेत? तसच शेकाप बरोबर काय ठरलय? त्याची माहिती दिली. “महाविकास आघाडीत बंडखोरी करणाऱ्या अनेकांनी अर्ज मागे घेतले आहेत. काही अर्ज मागे घेण्यासाठी चालले आहेत” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “आता एक तासाने तीन वाजता मुदत संपेल. एक तासानंतर कोणी अर्ज मागे घेतले, कोणी नाही हे चित्र स्पष्ट होईल” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“कोणी अर्ज मागे घेतले नसतील, तर नाइलाजाने कारवाई करावी लागेल. मात्र, आमचा पूर्ण प्रयत्न आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे ही निवडणूक लढवत आहे. त्याबद्दल कुणाच दुमत नाही” असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. “जे कोणी अपक्ष, बंडखोर उभे राहिलेत, त्यांना सूचना गेल्या आहेत. तीन वाजता चित्र स्पष्ट झाल्यानंतर पुढचं पाऊल टाकू. आम्ही सगळीकडे सूचना दिली आहे. अनेक बंडखोरांनी अर्ज मागे घेतले आहेत” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शेकापला किती जागा सोडल्या?

शेतकरी कामगार पक्षासोबत झालेल्या चर्चेबद्दलही उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली. “जयंत पाटील काल संजय राऊतांच्या भेटीला आले होते. माझ्याशी त्यांची फोनवरुन चर्चा झाली. उरणची जागा आम्ही लढवतोय. अलिबाग, पेण आणि पनवेलची जागा शेतकरी कामगार पक्षाला दिली आहे. आमचे तिथले उमेदवार उमेदवारी अर्ज मागे घेतली. तीन नंतर सर्व चित्र तुमच्यासमोर येईल” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow Us
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल