AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : बंडखोरी रोखण्यासाठी शेवटचा 1 तास, उद्धव ठाकरेंच महत्त्वाच स्टेटमेंट

Uddhav Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. 29 ऑक्टोंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज किती उमेदवार निवडणूक रिंगणात राहतील? ते चित्र स्पष्ट होईल. 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. 23 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

Uddhav Thackeray : बंडखोरी रोखण्यासाठी शेवटचा 1 तास, उद्धव ठाकरेंच महत्त्वाच स्टेटमेंट
उद्धव ठाकरेImage Credit source: ANI
| Updated on: Nov 04, 2024 | 2:00 PM
Share

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचा एक तास उरला आहे. त्याआधी महाविकास आघाडीकडून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी रोखण्यासाठी मविआकडून काय प्रयत्न सुरु आहेत? तसच शेकाप बरोबर काय ठरलय? त्याची माहिती दिली. “महाविकास आघाडीत बंडखोरी करणाऱ्या अनेकांनी अर्ज मागे घेतले आहेत. काही अर्ज मागे घेण्यासाठी चालले आहेत” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “आता एक तासाने तीन वाजता मुदत संपेल. एक तासानंतर कोणी अर्ज मागे घेतले, कोणी नाही हे चित्र स्पष्ट होईल” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“कोणी अर्ज मागे घेतले नसतील, तर नाइलाजाने कारवाई करावी लागेल. मात्र, आमचा पूर्ण प्रयत्न आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे ही निवडणूक लढवत आहे. त्याबद्दल कुणाच दुमत नाही” असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. “जे कोणी अपक्ष, बंडखोर उभे राहिलेत, त्यांना सूचना गेल्या आहेत. तीन वाजता चित्र स्पष्ट झाल्यानंतर पुढचं पाऊल टाकू. आम्ही सगळीकडे सूचना दिली आहे. अनेक बंडखोरांनी अर्ज मागे घेतले आहेत” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शेकापला किती जागा सोडल्या?

शेतकरी कामगार पक्षासोबत झालेल्या चर्चेबद्दलही उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली. “जयंत पाटील काल संजय राऊतांच्या भेटीला आले होते. माझ्याशी त्यांची फोनवरुन चर्चा झाली. उरणची जागा आम्ही लढवतोय. अलिबाग, पेण आणि पनवेलची जागा शेतकरी कामगार पक्षाला दिली आहे. आमचे तिथले उमेदवार उमेदवारी अर्ज मागे घेतली. तीन नंतर सर्व चित्र तुमच्यासमोर येईल” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...