AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्पेशल रिपोर्ट | राजधानी मुंबईत शिवसेनेचा मुख्यमंत्री, पण उपराजधानीत पक्षाला पदाधिकारीच नाही, भाजपला टक्कर कशी देणार?

उपराजधानीत शिवसेना पक्ष सध्या विना पदाधिकाऱ्यांचा आहे (Nagpur Shiv Sena). त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

स्पेशल रिपोर्ट | राजधानी मुंबईत शिवसेनेचा मुख्यमंत्री, पण उपराजधानीत पक्षाला पदाधिकारीच नाही, भाजपला टक्कर कशी देणार?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jul 17, 2020 | 5:34 PM
Share

नागपूर : महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे (Nagpur Shiv Sena). भाजपला टक्कर देण्यासाठी पक्ष मजबूत करा, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. पण भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात शिवसेनेला ग्रहण लागलं आहे. उपराजधानीत शिवसेना पक्ष सध्या विना पदाधिकाऱ्यांचा आहे (Nagpur Shiv Sena). त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. विना पदाधिकारी फडणवीसांच्या नागपुरात शिवसेना भाजपला टक्कर कशी देणार? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे.

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. पण उपराजधानीत शिवसेनेचा कारभार सध्या राम भरोसे सुरु आहे. नागपुरात शिवसेनेला सध्या शहराध्यक्ष आणि जिल्हाप्रमुख नाही. विना पदाधिकारी शिवसेना नागपुरात भाजपला टक्कर कशी देणार? हाच मोठा प्रश्न आहे.

हेही वाचा : आपआपसात मारामाऱ्या करा, पण लोकांचा फायदा करा : देवेंद्र फडणवीस

राज्यात शिवसेनेने भाजपची साथ सोडत काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात धरला. राज्यात पहिल्यांदा महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. तेव्हापासून शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. शिवसेनेचे नेते भाजपला टक्कर देण्याची भाषा करत आहेत. पण फडणवीसांचा गड असलेल्या नागपुरात शिवसेना विना पदाधिकारी भाजपला टक्कर कशी देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

नागपुरात शिवसेनेला गेल्या काही दिवसांपासून ग्रहण लागलं आहे. शिवसेना शहरप्रमुख मंगेश कडवविरोधात अनेक गुन्हे दाखल झाले. त्यामुळेच पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. जिल्हा युवा सेना प्रमुखांवरही गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पक्षाने थेट जिल्हाप्रमुख माजी खासदार प्रकाश जाधव यांनाच स्थगिती दिली. त्यामुळे उपराजधानीतील शिवसेनेला सध्या जिल्हाप्रमुख आणि शहर प्रमुख दोन्ही नाहीत.

शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांचं नागपुरकडे कायम दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळेच एवढ्या वर्षांत शिवसेनेला नागपूर शहरात फारसं यश आलं नाही. आता सत्तेचा फायदा होईल, इथली शिवसेना बळकट होईल, असा सामान्य शिवसैनिकांना आशावाद होता. पण पदाधिकारीच नाही, तर मग नागपूर शहरात शिवसेनेला बळकट कोण करणार? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

Follow Us
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?