AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Congress: गरज पडली तर बाहेरुन आघाडीला पाठिंबा देऊ, काँग्रेस बैठकीनंतर नाना पटोलेंची मोठी घोषणा

राजकीय महाभारत क्षमलं पाहिजे. या अस्थीर व्यवस्थेमध्ये जे राज्याच्या जनतेचं नुकसान होतंय, राज्याच्या विकासाचं नुकसान होतंय ते थांबलं पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. महाविकास आघाडीचं सरकार काय राहण्याच्या दृष्टीकोनातून आमचं विचारमंथन झालेलं आहे.

Congress: गरज पडली तर बाहेरुन आघाडीला पाठिंबा देऊ, काँग्रेस बैठकीनंतर नाना पटोलेंची मोठी घोषणा
गरज पडली तर बाहेरुन आघाडीला पाठिंबा देऊImage Credit source: Tv9
| Updated on: Jun 23, 2022 | 7:14 PM
Share

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्याबाबत काँग्रेसची आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक (Meeting) पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी नाना पटोलेंनी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचं ठामपणे सांगितलं. आज जी स्थिती झालीये. आम्हाला विरोधाचं मँडैट दिलं होतं. वेळ आली तर शिवसेनेने बाहेरुन पाठिंबा (Support) मागितला महाविकास आघाडीसाठी तरी आम्ही द्यायला तयार आहोत. पण काही गडबड झालीच त्यांच्याकडून तर आम्ही विरोधात बसायलाही तयार आहोत, ही भूमिका आम्ही सकाळीच मांडली आहे, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. तसेच महाविकास आघाडी 5 वर्षे पूर्ण करणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

काय म्हणाले नाना पटोले ?

राजकीय महाभारत क्षमलं पाहिजे. या अस्थीर व्यवस्थेमध्ये जे राज्याच्या जनतेचं नुकसान होतंय, राज्याच्या विकासाचं नुकसान होतंय ते थांबलं पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. महाविकास आघाडीचं सरकार काय राहण्याच्या दृष्टीकोनातून आमचं विचारमंथन झालेलं आहे. संजय राऊतांच्या वक्तव्याबाबतही चर्चा झाली. राऊतांचे वक्तव्य त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबींवर आहे, महाविकास आघाडीबाबत नाही. भाजपने जो काही शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे, तो कसा थांबवता येईल त्याबाबतही चर्चा सुरु आहे. काँग्रेस मविआत आहे आणि राहणार.

भाजप अस्थिरता निर्माण करतंय

राज्यपाल कुणाचं ऐकतात हे सांगण्याची गरज नाही. भाजप अस्थिरता निर्माण करतंय. ज्यांनी महाराष्ट्रात सत्तासंघर्ष आणि अस्थिरता निर्माण केली, ते भाजप समोर का येत नाही ? त्यांच्याकडे अजूनही बहुमत नाही. त्यांना सत्तेची लालसा आहे. ईडीच्या माध्यमातून या पद्धतीने लोकशाहीचा खून करण्याचं काम करतंय. भाजपला आव्हान करतो की सरकार अल्पमतात असेल त्यांनी तसं आणावं. (Nana Patoles reaction to Mahavikas Aghadi and Shiv Sena after the Congress meeting)

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.